सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी देशविदेशांतून २५ सहस्र, तर कोल्हापूर जिल्ह्यातून दीड सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार !

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सुरेश यादव, डॉ. अश्विनी माळकर, श्री. राजेंद्र तोरस्कर, श्री. अभिजित पाटील, श्री. आनंदराव पवळ, श्री. अभय वर्तक, डॉ. मानसिंग शिंदे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. आनंदराव काशीद

कोल्हापूर, ८ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. या वेळी २५ सहस्र साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती असणार आहे, हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दीड सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी होणार आहेत, अशी माहिती सनातन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली. ते ८ मे या दिवशी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक डॉ. मानसिंग शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा संयोजक श्री. आनंदराव पवळ आणि श्री. नितीन काकडे, वीर शिवा काशीद यांचे वंशज आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पन्हाळा तालुका संयोजक  श्री. आनंदराव काशीद,  अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र शिवाजी तोरस्कर, ‘आरोग्य भारती’च्या डॉ. अश्विनी माळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारे पक्ष आणि हिंदु संघटना 

या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारत हिंदु महासभा, वारकरी संप्रदाय, हिंदु एकता आंदोलन, विश्व हिंदु परिषद, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक आणि विविध भाविक उपस्थित रहाणार आहेत.