‘अबिर गुलाल’ चित्रपटातून करणार होता हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन

इस्लामाबाद – पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील आतंकवादी तळांवर भारतीय सैन्याने आक्रमण केल्यावर पाकिस्तानी कलाकारांनी भारताच्या विरोधात गरळओक चालू केली आहे. हानिया आमिर आणि माहिरा खान यांनी ‘ऑपरेशन सिंदुर’वरून भारतावर टीका केली होती. त्यानंतर अभिनेते फवाद खान याने भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला ‘लज्जास्पद’ म्हटले आहे. याच फवाद खान याचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार होता; परंतु पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावर भारतात थेट बंदी घालण्यात आली. या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार होता.
Pakistani actor Fawad Khan calls 'Operation Sindoor' shameful — all while eyeing a Bollywood comeback with 'Abir Gulaal'.
This exposes the mindset of many Pakistani artists. Yet, they continue to get red carpet treatment in Indian cinema. Outrageous.
🇮🇳 #OperationSindoor2 |… pic.twitter.com/g9g9PBz4de
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 8, 2025
फवाद खान याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘या लज्जास्पद आक्रमणात प्राण गमावलेल्या आणि घायाळ झालेल्या कुटुंबियांविषयी मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो. माझी सर्वांना आदरयुक्त विनंती आहे की, गोंधळ उडवणार्या शब्दांनी आग लावणे थांबवा. सर्वांना सदबुद्धी मिळो, इन्शाल्लाह. पाकिस्तान जिंदाबाद.’
संपादकीय भूमिकायावरून पाकिस्तानी कलाकरांची मानसिकता लक्षात येते. अशा कलाकारांना भारतीय चित्रपटसृष्टीत पायघड्या घातल्या जातात, हे संतापजनक आहे ! |