Gujarat Police Deport Bangladeshi Infiltrators : गुजरातमध्ये पोलिसांनी ३०० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना भारतातून  हाकलले

कर्णावती – गुजरात पोलिसांनी ‘ऑपरेशन डिपोर्ट बांगलादेशी’ अंतर्गत ३०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना भारतातून हाकलले आहे. पहलगाम येथील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर राज्यभर विशेष शोधमोहीम राबवून या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अन्वेषण आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना टप्प्याटप्प्याने परत पाठवण्यात आले.

१. कर्णावती आणि सुरत या शहरांसह राज्यातील विविध शहरांमधून या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांना विशेष विमानाने आगरतळा (त्रिपुरा) येथे पाठवण्यात आले.

२. पुढील कारवाईसाठी त्यांना रस्त्याने नेण्यात आले. पहलगाम येथील आक्रमणानंतर २७ एप्रिल या दिवशी पोलिसांनी राज्यभरात अवैध बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची मोहीम चालू केली.

३. कर्णावती येथे ८०० आणि सुरत येथे सुरतमध्ये १३४ संशयित बांगलादेशी घुसखोर पकडले गेले.

परत जाण्यासाठी घुसखोरांना १० दिवसांचा अवधी

अवैधरित्या वावरणार्‍या घुसखोरांना पकडल्यानंतर त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया चालू करण्यास बराच वेळ लागतो; मात्र या वेळी पोलिसांनी आधीच ठरवले होते की, पकडलेल्या घुसखोरांना त्वरित परत पाठवले जाईल. ‘ऑपरेशन डिपोर्ट’ चालू करून कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी १० दिवसांचा अवधी निश्चित केला होता.

संपादकीय भूमिका

प्रत्येक राज्यातील पोलिसांनी अशी कृती केल्यास बांगलादेशी घुसखोरीची समस्या संपुष्टात यायला वेळ लागणार नाही !