देवस्थान कायद्यात पालट करण्याचा सरकारचा तूर्तास विचार नाही ! – मुख्यमंत्री सावंत

मुख्यमंत्री सावंत

पणजी, ६ मे (वार्ता.) – शिरगाव येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान कायद्यात सुधारणा करण्याचा तूर्तास कोणताही विचार नाही आणि तशी चर्चाही कुणी सरकारकडे केलेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

देवस्थान समितीच्या कारभारात मार्गदर्शकाची भूमिका बजावणे आणि त्यावर नियंत्रण आणणे यांसाठी सरकार कायद्यात पालट करू शकते, असे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. सरकारने वर्ष २०२३ मध्ये विधानसभेत स्पष्ट केले होते की, देवस्थानच्या अंतर्गत वादामध्ये थेट हस्तक्षेप करणे आम्हाला योग्य वाटत नाही आणि अशा प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगानेच कार्यवाही केली जाणार आहे.