कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली !
म्हसावद (जिल्हा जळगाव) – रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वेच्या मार्गावर रुळांवर दगड ठेवल्याचे रेल्वे कर्मचार्याच्या लक्षात आले. सतर्क रेल्वे कर्मचार्याला ही गोष्ट लक्षात आल्याने संभाव्य अपघात टळला आहे. कर्मचार्याला नेहमीच्या पडताळणीच्या वेळी रुळांच्या मधोमध, तसेच दोन्ही रुळांवर मोठे दगड ठेवलेले दिसले. ही गोष्ट तातडीने नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली. कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुळांवरील दगड बाजूला केले.
यामुळे मोठा अपघात होऊन रेल्वेची, तसेच जीवितहानीही होण्याची शक्यता होती, अशी माहिती रेल्वे कर्मचार्यांनी दिली. घटनास्थळाचा पंचनामा चालू असून पोलीस परिसरातील नागरिकांकडे चौकशी करत आहेत.
संपादकीय भूमिका
|