शेवटचा आतंकवादी संपेपर्यंत पाकवर आक्रमण चालूच ठेवा ! – सकल हिंदु समाज

कोल्हापूर शहर येथे जमलेले विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर, ७ मे (वार्ता.) – जोपर्यंत पाकिस्तानमधील शेवटचा आतंकवादी संपत नाही, तोपर्यंत पाकिस्तानवर आक्रमण करणे चालूच ठेवावे, पाकव्याप्त काश्मीर भारताने कह्यात घ्यावे, तसेच पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून नष्ट करावे, अशी एकमुखी मागणी सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आली. भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईविषयी सकल हिंदु समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे पेढे आणि साखर वाटून अभिनंदन करण्यात आले. त्या प्रसंगी ही मागणी करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. सौरभ निकम इत्यादी उपस्थित होते.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे अन् श्री. उदय भोसले, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, आरोग्य भारतीच्या डॉ. अश्विनी माळकर, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, तसेच अन्य उपस्थित होते.