प्रसारातील युवा साधकांना मिळालेल्या सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनातील काही भाग ६ मे या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/910607.html

८. भावासहित प्रार्थना केल्यावर ईश्वर समोर दिसणे
श्री. सिद्धेश बराले : मी कोणतीही समस्या आल्यावर प्रार्थना करतो. पूर्वी मी समस्या आल्यावर बुद्धीच्या स्तरावर सर्व प्रयत्न करत होतो. आता कोणत्याही क्षणी प्रयत्न करतो, तेव्हा ईश्वरालाच विचारतो, ‘आता कसे करायचे आहे ?’ मी ईश्वराचे स्मरण करतो. तेव्हा ईश्वर समोर येतो. जेव्हा आपल्याला प्रार्थना करतो, तेव्हा आपण मला दिसता आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करतो, तेव्हा श्रीकृष्ण दिसतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले (अन्य साधकांना) : तुम्ही एवढ्या प्रार्थना करत नाहीत ना ? किती जण एवढ्या प्रार्थना करतात ? (सर्वांनी हात वर केल्यावर) सर्वांना सत्संगात प्रार्थनाच शिकवतात का ? शाब्बास !

९. ‘सनातन संस्थे’चे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती
९ अ. पू. सौरभ जोशी यांनी प्रसादाच्या स्वरूपात दिलेली गोळी खाल्ल्यामुळे पोटदुखी थांबणे !
श्री. आर्य प्रवीण नाईक : काल मला पू. सौरभदादांचे दर्शन झाले. शिबिराचे अंतिम सत्र चालू होते. तेव्हा माझ्या पोटात थोडसे दुखू लागले. पू. सौरभदादांनी प्रसाद म्हणून दिलेली लिमलेटची गोळी खाल्ल्यावर लगेच माझी पोटदुखी थांबली. तेव्हा मला पुष्कळ चांगले वाटले. नंतर मी एका साधिकेला सांगितले की, मला अजून गोळ्या द्या. काल मी खोलीत गेलो, तर पुन्हा माझ्या पोटात दुखू लागले आणि त्याच भावाने मी त्या गोळ्या खाल्ल्या. तेव्हाही मला पुन्हा बरे वाटले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : खूप छान !
९ आ. साधना करून भावजागृती होण्यासाठी कितीतरी वर्षे लागतात; परंतु संतांचे काही शब्द ऐकताच भावजागृती होणे
सावित्री : काल पू. सौरभदादांना भेटायला गेले होते. मी त्यांच्या खोलीत प्रवेश केला. तेव्हा माझा भाव पुष्कळ जागृत झाला. स्वतःचा परिचय करून देतांना आम्ही आपले नाव सांगत होतो. तेव्हा पू. सौरभदादांनी स्वतःच्या मुखाने माझे नाव घेतले. मला ‘सावित्री’ असे म्हणून हाक मारली. तेव्हाही माझा भाव पुष्कळ जागृत झाला आणि त्यांच्या खोलीतून बाहेर आल्यानंतरही भावाश्रू थांबले नव्हते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्याला भावजागृती करायला किती वर्षे साधना करावी लागते ना ? सौरभदादा संत असल्याने ते काही शब्द बोलले, तरीही भावजागृती होते. हे संतांचे महत्त्व आहे !
सावित्री : मी पू. सौरभदादांच्या चरणांना स्पर्श केला. तेव्हा मला वाटत होते, ‘जणू मी आपल्याच चरणांना स्पर्श करत आहे.’ तेव्हाही माझा भाव पुष्कळ जागृत होत होता. पू. सौरभदादांना ताईने (आश्रम दाखवणारी साधिका) विचारले, ‘‘आता आम्ही जाऊ शकतो का ?’’ तेव्हा पू. सौरभदादा काहीच बोलले नाहीत. तेव्हा त्यांच्या आईने सांगितले, ‘‘ते कोणत्याही साधकाला सहजपणे जाऊ देत नाहीत. जेव्हा त्यांना भेटायला साधक येतात, तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद होतो.’’ त्या वेळी आम्हा सर्व साधकांनाही वाटत होते, ‘आम्ही येथेच थांबावे.’ सर्वांच्या मनात पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
परात्पर गुरु डॉ. आठवले : फारच छान !
(क्रमश:)