सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत उष्णता जाणवणे, त्याचे संशोधन आणि कारणमीमांसा

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या खोलीत डिसेंबर २०२४ पासून उष्णता जाणवत होती. जानेवारी २०२५ मध्ये ही उष्णता पुष्कळ वाढली. याविषयी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सहकारी यांनी याविषयी संशोधन केले. या संशोधनातील उन्नतांच्या शरिरातून उष्णता प्रक्षेपित होण्याचे आयुर्वेदानुसार कारण ७ मे या दिवशी पाहिले. आज पुढील भाग येथे दिला आहे.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/910983.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

८. गुरुदेवांच्या खोलीतील उष्णतेच्या संदर्भात सूक्ष्मातील ज्ञानातून लक्षात आलेली कारणमीमांसा

८ अ. ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील मोठ्या वाईट शक्तींशी चाललेले सूक्ष्मातील युद्ध

८ अ १. पहिली विचारसरणी

सुश्री (कु.) मधुरा भोसले

८ अ १ अ. ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील मोठ्या वाईट शक्ती करत असलेल्या सूक्ष्मतम आक्रमणांशी गुरुदेव स्थूल अन् सूक्ष्म देहांतून दशदिशांना मारक शक्तीचे प्रक्षेपित करून सर्वाेच्च आध्यात्मिक स्तरावर अखंड लढत असणे : ‘देवासुर संग्रामाचा सूक्ष्म स्तरावरील परिणाम श्रीविष्णूचे अंशावतार असलेले गुरुदेव यांच्यावरही होत असल्याने त्यांची प्राणशक्ती अत्यल्प झाली आहे. त्यामुळे त्यांना दिवसभर ग्लानी आणि थकवा असतो. ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील मोठ्या वाईट शक्ती गुरुदेवांवर दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या निर्देशानुसार सूक्ष्मतम आक्रमणे करत आहेत. त्यामुळे गुरुदेव हे अस्तित्वाच्या स्तरावर, म्हणजे सर्वाेच्च आध्यात्मिक स्तरावर पाताळातील या वाईट शक्तींशी अखंड लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांतून दशदिशांना पुष्कळ प्रमाणात मारक शक्तीचे प्रक्षेपण होत आहे. गुरुदेव आणि ते रहात असलेली खोली यांच्याभोवती दैवी मारक शक्तीचे अभेद्य संरक्षककवच निर्माण झाले आहे.

८ अ १ आ. गुरुदेवांच्या खोलीतील लादी आणि भिंती यांतून मारक शक्ती प्रक्षेिपत होत असल्याने त्यांच्या खोलीतील लादी अन् भिंती यांची उष्णता तळहाताला जाणवत असणे : मारक शक्ती उष्ण स्वरूपाची असून ती गुरुदेवांच्या खोलीतील लादी आणि भिंती यांतून पृथ्वीच्या वायूमंडलात प्रक्षेपित होते. त्यामुळे डिसेंबर २०२४ पासून गुरुदेवांच्या खोलीतील लादी आणि भिंती यांपासून सुमारे ३ ते ४ फूट अंतरावर तळहात धरल्यास तळहाताला उष्णता जाणवते.

८ अ १ इ. गुरुदेवांचा देह आणि त्यांची खोली यांच्यात निर्माण झालेल्या उष्ण स्वरूपाच्या मारक शक्तीमुळे झालेला आध्यात्मिक लाभ : डिसेंबर २०२४ च्या आरंभापासून ७ व्या पाताळातील गुरु मोठ्या वाईट शक्तींनी त्यांच्या संकल्पसिद्धीने सिद्ध केलेले शीतलास्त्र गुरुदेवांच्या दिशेने पृथ्वीवर सोडले. या अस्त्रामुळे गुरुदेवांचा देह आणि त्यांची खोली यांचे तापमान ५० ते १०० अंश सेल्सिअसने न्यून होऊन गुरुदेवांचा देह थंडीने गोठणार होता. या अस्त्राकडे व्यक्ती आणि तिच्या सभोवतालचे वातावरण यांची उष्णता खेचली जाते, तसेच या अस्त्रातून शीतल वायूचा प्रवाह वहातो. त्यामुळे व्यक्तीचे शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांचे तापमान जलद गतीने न्यून होऊन ते अत्यंत शीतल बनते. त्यामुळे व्यक्तीचा देह शीतलतेने गोठला जाऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो.

हे सूक्ष्मातील आक्रमण परतवण्यासाठी हनुमंताने पृथ्वीच्या दिशेने मारक शक्तीयुक्त उष्ण वायूचा प्रवाह तोंडाने फुंकर मारून प्रक्षेपित केला आणि गुरुदेवांचा देह अन् त्यांची खोली यांचे तापमान वाढवून ते दोन्ही उष्ण बनवले. ‘शीतलता वाढू नये’, यासाठी रामभक्त हनुमानाने त्याच्या मुखातून मारक शक्तीने युक्त असणार्‍या उष्ण वायूची फुंकर घातली. त्यामुळे उष्णता निर्माण करणार्‍या वायूचा प्रवाह रामलोकातून पृथ्वीच्या दिशेने आला आणि तो गुरुदेवांच्या खोलीत कार्यरत झाला. परिणामी वाईट शक्तींनी सोडलेले शीतलास्त्र विफल झाले आणि गुरुदेवांच्या खोलीतील तापमान न्यून न होता तितकेच राहिले. त्यामुळे गुरुदेव आणि त्यांच्या सेवेतील साधक यांचे शीतलास्त्रापासून रक्षण होऊन ते गारठ्याने गोठण्यापासून वाचले अन् त्यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळले.’

(क्रमश:)

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/911670.html

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ( ९.१.२०२५)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.