
सांगली – शामरावनगर येथील मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा प्रशासन अधिग्रहित करत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने २ दिवसांच्या कार्यकाळात संशयास्पदरित्या दफनभूमीची जागा अधिग्रहित करण्याचे कार्यालयीन कामकाज घाईगडबडीत उरकण्यात आले आहे. याबाबतचे महासभेचे ठराव, स्थायी समितीचे ठराव हेसुद्धा अखेरच्या दोन ते तीन दिवसांत करण्यात आले आहेत. त्यामुळे मुसलमान आणि ख्रिस्ती दफनभूमीसाठी भूसंपादनाची कार्यवाही तात्काळ थांबवावी, तसेच भूसंपादन तात्काळ रहित करावे; अन्यथा जनहित याचिका प्रविष्ट केली जाईल, अशी चेतावणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. या वेळी मनोज साळुंखे, अरुण वाघमोडे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, नारायण हांडे उपस्थित होते. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)