Shahbaz Sharif On Operation Sindoor : (म्हणे) ‘आम्ही याचे कठोर प्रत्युत्तर देऊ !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे उसने अवसान आणत विधान !

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी भूमीवर ५ ठिकाणी भ्याड आक्रमणे  करण्यात आली आहेत. या युद्धजन्य कृत्याला कठोर प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि तो प्रत्युत्तर दिला जात आहे. पाकिस्तान सैन्य आणि राष्ट्र यांना शत्रूशी कसे सामोरे जायचे ?, हे चांगलेच ठाऊक आहे. आम्ही त्यांचे वाईट हेतू कधीही यशस्वी होऊ देणार नाही. पाकिस्तानचे सैन्य आणि जनता पूर्णपणे एकजूट आहे आणि देशाचे मनोबल उंचावलेले आहे, अशी प्रतिक्रिया पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने केलेल्या कारवाईनंतर एक्सवर पोस्ट करत व्यक्त केली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ७ मेच्या सकाळी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली.

संपादकीय भूमिका

पाकने प्रत्युत्तर द्यावेच, म्हणजे पाकला संपूर्ण नष्ट करण्यासाठी भारताला अधिक चांगले कारण मिळेल !

दोन्ही देशांना अधिकाधिक सैनिकी संयम बाळगावा ! – संयुक्त राष्ट्राचे आवाहन

संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी ६ मेच्या रात्री दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महासचिव अँटोनियो गुटेरेस नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय सैन्य कारवायांविषयी अत्यंत चिंतेत आहेत. त्यांनी ‘दोन्ही देशांनी अधिकाधिक सैनिकी संयम बाळगावा. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सैनिकी संघर्ष कुणालाही न परवडणारा आहे’, असे विधान केले.

संपादकीय भूमिका

संयुक्त राष्ट्र म्हणजे एक बुजगावणे आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशा विधानांविना कोणतीच अपेक्षा करता येत नाही. गेली ७८ वर्षे काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे भिजत पडलेला असतांना त्याने काहीच न केल्यामुळेच आजची स्थिती निर्माण झाली आहे, हे लक्षात ठेवायला हवे !