पणजी, ६ मे (वार्ता.) – कर्नाटक म्हादईवर कळसा-भंडुरा प्रकल्प उभारून म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये मलप्रभा नदीत वळवू पहात आहे आणि या प्रकल्पाला केंद्राने कर्नाटकला अजूनही पर्यावरण दाखला दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हुबळ्ळी विमानतळावर पत्रकारांना म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यातील राजकारणामुळे कर्नाटकच्या कळसा-भंडुरा प्रकल्पांना पर्यावरण दाखला देण्यास सिद्ध नाहीत. यामुळे प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट खात्याने पर्यावरण दाखला अजूनही दिलेला नाही. केंद्राने या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे; मात्र प्रकल्पांना पर्यावरण दाखला मिळाल्यानंतर कर्नाटक सरकार त्वरित प्रकल्पाचे काम हाती घेणार आहे.’’
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या पुढे म्हणाले, ‘‘कर्नाटकचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हादईप्रश्नी कर्नाटकची बाजू भक्कम करण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नाहीत; मात्र प्रकल्प प्रलंबित रहात असल्याने केवळ कर्नाटक सरकारला दोष देत असतात.