
मुंबई – सरकारची भूमिका युद्धाची असेल, तर काँग्रेसचा पाठिंबा आहे; परंतु सरकार वेळ का घालवत आहे ? सध्या युद्ध केवळ वृत्तवाहिन्यांवरच चालू आहे. प्रत्यक्ष युद्ध करून धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. सरकारने ते तातडीने करावे. इंदिरा गांधी यांनी सैन्य लाहोरपर्यंत घुसवले होते. आपल्या देशाची युद्धाची शक्ती प्रचंड मोठी आहे. १४० कोटींचा हा देश आहे. सर्वांशी सीमेवर जाऊन सूसू केली, तरी ते वाहून जातील. एक घाव दोन तुकडे करून टाका. आतंकवादी सापडत नाहीत. ते सीमेपार गेले कि नाही, ते कळत नाही. सुरक्षेचे सूत्र वार्यावर का सोडले आहे ?, असे प्रतिपादन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.