
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पशूसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या आढावा बैठकीत राज्यात गोसंवर्धन आणि दुग्धउद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी राज्यातील गोरक्षण केंद्रांना स्वावलंबी बनवण्यासाठी ठोस योजना सिद्ध करण्याचा आदेश दिला. त्यांनी सरकारी इमारतींवर शेणापासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाच्या वापराला प्रोत्साहन देण्याविषयी सूचना दिली, तसेच दुग्धक्षेत्राला सक्षम बनवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
१. मुख्यमंत्र्यांनी विभागीय पातळीवर देशी गायींच्या संवर्धनासाठी स्पर्धा आयोजित करण्याचा आणि उत्कृष्ट गोशाळांना सन्मानित करण्याचा प्रस्ताव मांडला.
२. बरेलीमध्ये आवनला येथील सेंद्रिय खत आणि गोमूत्र प्रक्रिया प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहे, असे त्यांनी सांगितले.
३. राज्यभरातील ७ सहस्र ६९३ गोशाळांमध्ये अनुमाने ११ लाख ४९ सहस्र गायींना आश्रय देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी निवारा केंद्रांमध्ये नियमितपणे पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे, तसेच कोंडा आणि पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
अखिलेश यादव यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर फुकाची टीका
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मुख्यंमत्र्यांच्या या निर्णयावर टीका करून त्यांनी घेतलेल्या निर्णयांना ‘गोबरनामा’ असे संबोधून त्याची खिल्ली उडवली आहे. (अखिलेश यादव यांना मुसलमानांच्या लांगूलचालनाची सवय जडली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचे इस्लमीकरण करण्यात धन्यता वाटते ! – संपादक)