संपादकीय : इस्लामचा त्याग !

प्रतिकात्मक छायाचित्र

जगभरात ५७ इस्लामी देश आहेत, तर १०० हून अधिक ख्रिस्ती देश आहेत; मात्र एकही हिंदु राष्ट्र नाही. इस्लामचा जन्म १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी अरब देशांमध्ये झाला आणि नंतर तलवारीच्या बळावर तो जगभरात पसरला. आज भारतातच सुमारे २५ कोटी मुसलमान आहेत, तर पाकिस्तानमध्ये जो भारताचा पूर्वीचाच भाग होता, तेथेही २४ कोटी मुसलमान आहेत. बांगलादेशातही जवळपास १५ कोटी मुसलमान आहेत. यातून भारतीय उपखंडातच ६५ कोटी मुसलमान आहेत. पूर्वी हे सर्व हिंदु होते. याच्या तुलनेत सध्या भारत आणि उपखंड यांत १०० कोटी हिंदु आहेत. युरोप आणि अमेरिका येथेही मोठ्या प्रमाणात मुसलमान आहेत. युरोपमध्ये तर मध्य-पूर्वेकडील देशांतून स्थलांतरित झालेल्या मुसलमानांमुळे अशांतता निर्माण झाली आहे. फ्रान्ससारख्या देशात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मुसलमान हिंसाचार करून देशाला वेठीस धरत असतात. ब्रिटनमध्येही मूळ इंग्रज अल्प होऊन मुसलमानांची संख्या वाढत आहे. एकीकडे ही स्थिती असतांना दुसरीकडे अनेक मुसलमान त्यांच्या धर्माचा त्याग करत असल्याचेही दिसून येत आहे. अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेच्या नुकत्याच सार्वजनिक झालेल्या अहवालात अमेरिकेत २५ टक्क्यांपेक्षा अधिक मुसलमानांनी इस्लाम सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे किंवा ते थेट नास्तिक बनले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर अन्य देशांमध्येही ही संख्या मोठी आहे. अनेक देशांतील आकडेवारी समोरही येऊ शकत नाही; कारण ती घोषित करण्यावर बंधने आहेत. विदेशातच नाही, तर भारतातही मुसलमान इस्लामचा त्याग करून एकतर अन्य धर्म स्वीकारत आहेत किंवा ते स्वतःला नास्तिकतावादी घोषित करत आहेत. केरळमध्ये ‘एक्स मुस्लिम्स’ नावाची एक संघटनाच कार्यरत आहे. विदेशातही अशा प्रकारच्या संघटना आहेत. इस्लामचा त्याग करण्यामागे महत्त्वाची कारणे, म्हणजे इस्लाममधील भेदभाव आणि कट्टरता आहे. यात अन्यही कारणे आहेत. काही व्यक्तींना इस्लामच्या तत्त्वज्ञानात तर्कसंगततेचा अभाव दिसला. अनेकांना इस्लामच्या मूलभूत गोष्टींविषयी प्रश्न होते; परंतु त्यांना उत्तरे मिळाली नाहीत. काही लोकांना इस्लाममध्ये महिलांच्या स्थानाबद्दल असंतोष होता. केरळमधील एका महिला पत्रकाराने इस्लामचा त्याग करतांना, ‘मला महिलांच्या संदर्भात असलेला भेदभाव सहन होऊ शकला नाही’, असे म्हटले होते. समाजातील काही लोकांच्या वागणुकीमुळे काही व्यक्तींनी इस्लामचा त्याग केला, तर काही लोकांना इस्लामच्या कायद्यांमध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनाची उदाहरणे दिसली.

भारतातील उत्तरप्रदेश सेंट्रल शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. आज ते जितेंद्र त्यागी म्हणून जीवन जगत आहेत. त्यांनी धर्म सोडून पुन्हा हिंदु धर्मात येतांना इस्लाममधील शिकवणीवर प्रचंड टीका केली होती. त्यांनी कुराणमधील २६ आयतांवर (वाक्यांवर) आक्षेप घेत ती त्यामधून काढून टाकण्यासाठी न्यायालयात याचिकाही प्रविष्ट केली होती. हे भारतातील मोठे उदाहरण आहे. दुसरीकडे अशा प्रकारे इस्लामचा त्याग करणार्‍यांना विरोधाचाही सामना करावा लागत आहे. कुटुंबियांकडून करण्यात येणारा बहिष्कार आणि सामाजिक बहिष्कार यांचा सामना करावा लागतो. ठार मारण्याच्या धमक्या मिळतात. मुळात तलवारीच्या बळावर इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यामुळे वाढलेल्या या धर्मातील बाटलेले आता कट्टर झाले आहेत आणि ते अन्य धर्मियांना विविध मार्र्गांनी बाटवण्याचा किंवा ठार करण्याचा प्रयत्न करत असतात. जिहादी आतंकवाद हा त्यातलाच एक प्रकार आहे. भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘भूमी जिहाद’ आदी प्रकारचे जिहाद चालूच आहेत. केवळ इस्लामचा त्याग करणार्‍यांनाच नाही, तर इस्लामवर टीका करणार्‍यांनाही अशा विरोधाला सामोरे जागे लागते. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन हे याचे प्रमुख उदाहरण आहे. त्यांनी तर थेटच म्हटले आहे की, इस्लाम असेपर्यंत जगात जिहादी आतंकवाद कायम रहाणार आहे. त्यांच्या या विधानाचा एकाही इस्लामी संघटनेने विरोध केलेला नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.

सरकारने योजना चालू करावी !

प्रतिकात्मक छायाचित्र

भारतातील अनेक मुसलमानांना त्यांचे पूर्वज हिंदु होते आणि त्यांची नावेही ठाऊक आहेत. यांतील काही जणांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेशही केला आहे. इस्लामचा त्याग करणार्‍यांना साहाय्य करणार्‍या संघटनाही कार्यरत आहेत. ‘एक्स मुस्लिम इन केरला’ ही संघटना इस्लामचा त्याग करणार्‍यांना समर्थन आणि मार्गदर्शन देते. ‘कौन्सिल ऑफ एक्स मुस्लिम्स ऑफ ब्रिटन’ ही इस्लामचा त्याग करणार्‍यांसाठी सुरक्षित आश्रय आणि समर्थन प्रदान करते. ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ एक्स मुस्लिम्स’ ही जर्मनीमधील संघटनाही अशाच प्रकारचे साहाय्य करते. इस्लामचा त्याग करणे सोपी गोष्ट नसली, तरी अनेक जण तो प्रयत्न करत असतांना दिसत आहेत. भारतात अनेक जण असे आहेत की, ज्यांना इस्लामचा त्याग करायचा आहे; पण कट्टरतावाद्यांमुळे आणि समाजातील असुरक्षिततेमुळे ते असे करण्यास धजावू शकत नाहीत. यांतील बहुतेकांना ठाऊक आहे की, ते पूर्वीचे हिंदु आहेत. अशा मुसलमानांसाठी भारत सरकारने योजना राबवणे आवश्यक आहे. केवळ मुसलमानच नाही, तर त्या सर्वच जणांसाठी ज्यांनी विविध कारणांमुळे हिंदु धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारला आहे, त्या सर्वांसाठीच ती योजना असली पाहिजे. गोव्यामध्ये पोर्तुगिजांच्या काळात बलपूर्वक बाटवण्यात आलेल्या ख्रिस्त्यांना ते हिंदु होते, हे ठाऊक आहे आणि आजही ते मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे असे लोक सरकारच्या योजनेमुळे त्यांच्या मूळ हिंदु धर्मात परत येऊ शकतील आणि सरकार त्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्या पुढील सामाजिक जीवनासाठी साहाय्य करील. भारतात मुसलमानांची वाढती संख्या अल्प करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरू शकेल. त्यामुळे जिहादी मानसिकता, कट्टरतावाद, दंगली आदी गोष्टींना चाप बसू शकतो. भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याने असे काही होईल किंवा एखादा सत्ताधारी राजकीय पक्ष असे धाडस करील, अशी शक्यता जरी नसली, तरी या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे, असे वाटत आहे. यावर चर्चा झाली पाहिजे. ५० ते ६० वर्षांपूर्वी ईशान्य भारतात ख्रिस्ती अत्यंत नगण्य होते; मात्र आज ईशान्य भारतातील अनेक राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत. याला तत्कालीन काँग्रेस सरकार उत्तरदायी आहे. जर सरकारमुळे असा पालट होत असेल, तर आताच्या सरकारने अशी धोरणे राबवून याच्या उलट करणे तितकेच आवश्यक आहे, असे वाटू लागले आहे. यासाठी त्यांनी हिंदूंच्या धार्मिक संघटनांचे, संत, महंत आदींचे साहाय्य घेतले पाहिजे. अशांना हिंदु धर्माचरण शिकवण्यासाठी शिक्षण देणे चालू केले पाहिजे.

जिहादी मानसिकता आणि त्यामुळे होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी बाटलेल्यांना पुन्हा हिंदु धर्म स्वीकारण्यासाठी सरकारने योजना राबवावी !