‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या खोलीत डिसेंबर २०२४ पासून उष्णता जाणवत होती. जानेवारी २०२५ मध्ये ही उष्णता पुष्कळ वाढली. याविषयी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सहकारी यांनी याविषयी संशोधन केले. या संशोधनातील खोलीतील लादी आणि भिंतीचे तापमान याविषयीची सूत्रे ६ मे या दिवशी पाहिली. आज पुढील भाग येथे दिला आहे.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/910613.html

६. गुरुदेवांच्या खोलीतील लाद्या आणि भिंती उष्ण जाणवल्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीतील गुरुदेवांच्या पादुकांसमोरील लादी अन् पादुकांच्या मागील भिंत उष्ण जाणवणे

‘गुरुदेवांच्या खोलीतील लाद्या आणि भिंती उष्ण जाणवू लागल्या. याचे कारण ‘पाताळातील, तसेच वातावरणातील अनिष्ट शक्तींशी गुरुदेवांकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे चाललेले सूक्ष्मातील युद्ध’, हे असल्याचे लक्षात आले. ‘जसे गुरुदेवांकडून हे कार्य आपोआप होत आहे, तसे त्यांच्या पादुकांकडूनही होत आहे का ?’, याचा अभ्यास करण्यात आला. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या जेथे सेवा करतात, त्या खोलीत काचेच्या पेटीमध्ये गुरुदेवांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. तेथील लादी आणि भिंत यांच्या उष्णतेच्या संदर्भात हा अभ्यास करण्यात आला. तो येथे दिला आहे.

वरील सारणीतून लक्षात येते, ‘गुरुदेवांच्या पादुकांकडूनही चैतन्य प्रक्षेपित करण्याचे आणि अनिष्ट शक्तींशी लढण्याचे कार्य अखंड चालू आहे.’ खरेतर या पादुका गुरुदेवांनी केवळ काही वेळ स्पर्श केलेल्या आहेत. तरीही गुरुदेवांचे तत्त्व त्यांच्यामध्ये आलेले आहे. तसेच गुरुदेवांचे जसे कार्य चालू आहे, तसेच कार्य पादुकांकडूनही होत आहे. हे भौतिकशास्त्रातील (Physics) ‘रेझोनन्स इफेक्ट’मुळे होते. (‘रेझोनन्स इफेक्ट’ म्हणजे तंबोर्याच्या एकाच प्रकारच्या दोन तारांपैकी त्यांतील एकीला ताण देऊन सोडल्यावर जो नाद उत्पन्न होतो, तोच नाद तंबोर्याच्या तशाच दुसर्या तारेमधून आपोआप निर्माण होतो.) गुरुदेवांची स्पंदने त्यांच्या पादुकांमध्ये आलेली असल्याने गुरुदेवांकडून जसे कार्य होत आहे, तसेच कार्य त्यांच्या पादुकांकडूनही होत आहे.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.३.२०२५)

७. उन्नतांच्या शरिरातून उष्णता प्रक्षेपित होण्याचे आयुर्वेदानुसार कारण
७ अ. उन्नतांच्या शरिरातून प्रक्षेपित होणारी ऊर्जा उष्ण असण्याचे कारण : संत आणि आध्यात्मिक उन्नतांकडून ईश्वरी शक्ती ग्रहण केली जाते. हीच शक्ती त्यांचे तळहात आणि तळपाय यांच्या माध्यमांतून प्रक्षेपित केली जाते. ही शक्ती रोगनिवारणासाठीही उपयुक्त असते. सर्वसाधारणातः अशा व्यक्ती पित्तप्रधान प्रकृतीच्या असतात. पित्त हे तेज आणि आप तत्त्वयुक्त असते. यामध्ये तेजतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे त्यांच्या शरिरातून प्रक्षेपित होणारी ऊर्जा उष्ण असते.
७ आ. तेजतत्त्व अधिक प्रमाणात असणार्या व्यक्तींचे व्यक्तीमत्त्व : या तेज तत्त्वामुळेच अशा व्यक्तींचे रहाणीमान सात्त्विक असते. त्यांच्या सभोवती एक सू्क्ष्म प्रभावळ असते. त्यांच्यामधील चैतन्यामुळे त्यांचा लोकांवर सहज प्रभाव पडतो. ते दानशूर असतात. बाह्यतः त्यांचे वागणे कठोर असले, तरी मनाने तो खूप प्रेमळ असतात. यांनी कधी तामसिक किंवा राजसिक अन्नपदार्थ ग्रहण केले, तर त्यामुळे त्यांच्या पित्तावर परिणाम होऊन ते आजारी पडू शकतात.
७ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांच्यातील तेजतत्त्व वाढूनही त्याचे त्यांच्यावर दुष्परिणाम कमी दिसण्याचे कारण : आयुर्वेदानुसार पित्त हे तेज आणि आप तत्त्वयुक्त असते. त्यातील आप तत्त्वामुळे तेजतत्त्व नियंत्रणात रहाते. काही कारणांस्तव तेजतत्त्वाचे प्रमाण वाढून आपतत्त्वाचे प्रमाण कमी झाले, तर शरिरातील उष्णता वाढू शकते आणि त्याचा शरिरावर विपरित परिणाम होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांची प्रकृती पित्त-कफ प्रधान आहे. कफ, म्हणजेच त्यांच्यामध्ये पृथ्वीतत्त्वही तितक्याच प्रमाणात आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या शरिरातील तेजतत्त्व वाढले, तरी त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावर कमी प्रमाणात दिसून येत आहे.
७ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांना जाणवणारी उष्णता कमी करण्यासाठी उपाय : प्रवाळयुक्त गुलकंद खाल्ल्याने उष्णता कमी होऊन उष्णतेची लक्षणे कमी होऊ शकतात.
– डॉ. के. नागराज सामगा, मडगाव, गोवा.
(क्रमश:)