साधकाला पहाटे श्री गुरूंच्या कार्याची आठवण होणे आणि नंतर सत्संगात श्री गुरूंचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असण्याच्या संदर्भात समजणे

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘१८.२.२०२५ या दिवशी मला पहाटे ४.१५ वाजता जाग आली. त्या वेळी माझ्या मनात ‘परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) करत असलेले कार्य आणि आद्य शंकराचार्यांनी केलेले कार्य’ यांसंदर्भात विचार आले. परम पूज्य समाजाला धर्मशिक्षण देऊन धर्मजागृती करत आहेत. ‘आद्य शंकराचार्यांनी केलेले कार्य आणि परम पूज्य करत असलेले कार्य’ यांबद्दल माझी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी

नंतर मला डोळ्यांसमोर श्रीरामाचे चित्र दिसले. माझ्या मनात श्रीरामाविषयी काहीही विचार नसतांना ‘हे चित्र कसे दिसले ?’, याचे मला आश्चर्य वाटले. त्याच वेळी मी भ्रमणभाषवर हनुमान चालिसा लावली. हनुमान चालिसाच्या शेवटच्या दोन ओळी शेष असतांनाच ते बंद झाले. नंतर मी श्रीकृष्णाचे चिंतन करण्यासाठी भ्रमणभाषवर श्रीविष्णुसहस्रनाम लावले होते. तेव्हा मला ‘श्रीकृष्णाय नमः आणि सनातनाय नमः’ असे ऐकू आले. याचे मला आश्चर्य वाटले.

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेनिमित्त गेल्यावर एका सत्संगात उपस्थित राहिलो. त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव १७ ते १९.५.२०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे’, असे मला समजले. त्यासाठी आम्हाला हनुमंताचा नामजप करायला सांगितला, तसेच ‘श्रीरामाचा नामजपही करू शकतो’, असे सांगण्यात आले. त्या वेळी ‘पहाटे माझ्या मनात आलेले विचार, मला दिसलेले श्रीरामाचे चित्र, मी भ्रमणभाषवर हनुमान चालिसा लावणे आणि मला ऐकू आलेले ‘श्रीकृष्णाय नमः आणि सनातनाय नमः’ या संदर्भात मला उलगडा झाला.

तेव्हा ‘गुरुदेव सगळ्या गोष्टींचे नियोजन करतात’, हे माझ्या लक्षात आले. या अनुभूतीबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६९ वर्षे) (२६.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक