पाकिस्तानच्या भू- राजकीय व्यवहार तज्ञाचा दावा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताचे उद्दिष्ट युद्ध करणे नव्हे, तर पाकिस्तानचा पाणीपुरवठा थांबवणे, हे होते. भारताच्या अलीकडच्या धाडसी निर्णयामागील खरा हेतू पाकिस्तानचे पाणी रोखणे, हा आहे. भारत केवळ चिनाब, झेलम आणि सिंधू नद्याच रोखू इच्छित नाही, तर अफगाणिस्तानातून जाणारी काबूल नदीही १२ ठिकाणी रोखू इच्छित आहे, असा दावा पाकचे भू-राजकीय व्यवहार तज्ञ डॉ. हुमा बकाई यांनी ‘जिओ न्यूज’ वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्याशी बोलतांना केला. तथापि भारत सरकारने अशा दाव्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारतीय राजदूतांनी तालिबान सरकारच्या उच्च अधिकार्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ही शंका घेतली जात आहे.
🇵🇰 Pakistani geopolitical expert Dr. Huma Baqai says 🇮🇳 India can block the flow of Kabul River water from Afghanistan to Pakistan! 🚱🌊
A potential flashpoint in the making? ⚠️#Geopolitics #IndiaPakistanWar#WaterCrisis #MockDrillspic.twitter.com/Vb1aufzTGb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 6, 2025
डॉ. हुमा बकाई यांनी पुढे म्हटले की, जर पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांत जायचे असेल, तर त्याने पाण्याचे सूत्र उपस्थित करावे.
भारत अफगाणिस्तानातील नद्या अडवेल का ?
१. काबुल नदी अफगाणिस्तानमध्ये उगम पावते आणि पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर ती खैबर पख्तूनख्वातील अनेक भागांसाठी जीवनरेखा बनते.
२. या नदीचे पाणी पेशावर, नौशेरा, अटोक आणि सिंधू नदीच्या संगमापर्यंत पोचते. ती येथील शेती आणि पाणीपुरवठा यांचे मुख्य स्रोत आहे.
३. पाकिस्तानने नद्यांच्या संदर्भात अफगाणिस्तानशी कोणताही करार केलेला नाही, त्यामुळे भारतासाठी ही एक मोठी संधी आहे.
४. भारताने काबुल नदीवर १२ धरणे बांधली आहेत, ज्याचा लाभ आता दिसून येत आहे. या नदीच्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पांवर भारत अफगाणिस्तानसमवेत काम करत आहे. या प्रकल्पाद्वारे भारत अफगाणिस्तानला ऊर्जा आणि सिंचन क्षेत्रात साहाय्य करतो. त्यामुळे जर या धरणांचे पाणी थांबवले, तर अफगाणिस्तानातील नद्यांमधून पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा थांबू शकतो. याद्वारे भारत एकही गोळी न चालवता पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडू शकतो.
५. काबूल नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवल्यास पाकिस्तानच्या पश्तून पट्ट्यात आणखी अस्थिरता निर्माण होईल, जिथे आधीच सैन्याविरुद्ध तीव्र असंतोष आहे.
६. पाकिस्तानची दुसरी समस्या म्हणजे त्यांच्याकडे पाणी साठवणुकीसाठी कोणतेही स्रोत नाहीत आणि भारताने अफगाणिस्तानात शाहतूत धरण, सलमा धरण असे प्रकल्प आधीच उभारले आहेत.