OIC Backs Pakistan : (म्हणे) ‘पहलगामवरील भारताचे आरोप निराधार !’

इस्लामी देशाची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’चे पाकला समर्थन

न्यूयॉर्क (अमेरिका) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणावरून पाकवर करण्यात आलेले भारताचे आरोप निराधार आहेत. या आरोपांमुळे दक्षिण आशियात तणाव वाढत आहे, असा दावा न्यूयॉर्कमधील ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ म्हणजे ओ.आय.सी. या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेने केला आहे. ‘काश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार नाकारला जात आहे, ज्याची हमी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संबंधित ठरावांमध्ये देण्यात आली आहे’, असेही संघटनेने म्हटले आहे.


ओआयसीने म्हटले आहे की, अशा आरोपांमुळे आधीच अस्थिर असलेली परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. आतंकवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध, मग तो कुठेही आणि कुणाकडूनही केला गेला असेल, तरी त्याचा निषेध आहे. (ओसायसीची बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ! पाकिस्तान जगभरातील आतंकवादासाठी आदर्श देश असतांना त्याला पाठीशी घालणार्‍या ओआयसीचा अशा प्रकारचा निषेध म्हणजे नक्राश्रूच होत ! – संपादक)

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांच्या संघटनेचे पाकला समर्थन न मिळाले, तरच आश्चर्य ! अशा संघटनांना भारत भीक घालत नाही, हे यापूर्वीच भारताने दाखवून दिले आहे !