|
(व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का.)

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे दीर्घकालीन व्हिसावर रहाणार्या पाकिस्तानी नागरिकांची पोलिसांनी चौकशी चालू केली असता २२ महिला पाकिस्तानी असल्याचे आढळून आले. या सर्वांनी येथे येऊन लग्न केले आहे. त्या सर्वांना मिळून ९५ मुलेही झाली आहेत. विशेष म्हणजे यांतील अनेक मुलांची लग्नेही झाली आहेत आणि त्यांनाही मुले झाली आहेत. या सर्व २२ महिलांचे आधार कार्ड बनवण्यात आले आहेत. त्या सरकारकडून देण्यात येणारे रेशनही घेत आहेत. या सर्वांना अद्याप भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही.
🚨 SHOCKING! 22 Pakistani women on long-term visas settled in Moradabad 🇮🇳 gave birth to 95 children — many now married! 👶👰♀️
Is India turning into a dharmashala? 😡
This massive security lapse exposes serious flaws in our intelligence system.
How many more such cases are… pic.twitter.com/vCcyqOzLzc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 6, 2025
संपादकीय भूमिकाधर्मशाळा बनलेला भारत ! या घटनेवरून भारतीय यंत्रणांवर हसावे कि रडावे ?, हेच लक्षात येत नाही ! आता इतक्या वर्षांनंतर ही माहिती समोर येते, यावरून भारताची अंतर्गत यंत्रणा किती कुचकामी आहे, हे लक्षात येते ! देशात अशी स्थिती आणखी किती ठिकाणी असेल, याची कल्पना करता येत नाही ! |