Pakistani Maulana Appeals : भारत आणि पाक यांच्यात युद्ध झाले, तर जनतेने या युद्धापासून दूर रहावे !

पाकमधील प्रसिद्ध लाल मशिदीच्या मौलानांचे आवाहन !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले, तर जनतेने या युद्धापासून दूर रहावे, असा सल्ला येथील प्रसिद्ध लाल मशिदीच्या मौलनांकडून देण्यात आला आहे.

मौलाना अब्दुल गाझी

या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यात मौलाना अब्दुल गाझी हे मशिदीमध्ये आलेल्या लोकांना विचारत आहे की, ‘तुम्ही भारताविरोधात लढणार का ? जे भारताविरोधात लढणार आहेत, त्यांनी हात वर करावा.’ तथापि तिथे असलेली एकही व्यक्ती हात वर करत नाही. त्यानंतर मौलाना या लोकांना उद्देशून म्हणतात की, तुम्ही समजूतदार आहात. हे युद्ध धर्मयुद्ध नाही, हे दोन देशांमधली युद्ध आहे, त्यामुळे हे युद्ध सरकारच लढेल. धर्मासाठी युद्ध आवश्यक आहे; मात्र दोन्ही देशांमधील या युद्धातून कुठलाही लाभ होणार नाही. भारतामध्ये जेवढा मुसलमानांचा छळ होत नाही, तेवढा पाकिस्तानमध्ये चालू आहे, असा आरोपही या मौलानांनी केला आहे. (‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड करणार्‍यांना चपराक ! – संपादक)

युद्ध झाल्यास आम्ही पश्तून लोक भारतासमवेत राहू ! – पश्तूनमधील एक इमाम

पाकच्या खैबर पख्तनख्वा प्रांतातील एका इमामाने (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणार्‍या व्यक्तीने) म्हटले की, जर भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले, तर आम्ही पश्तून लोक भारतासमवेत राहू.

संपादकीय भूमिका

भिकेला लागलेल्या पाकमध्ये स्थानिक नागरिक आणि मौलाना यांनाही पाकचा पराभव समोर दिसत असल्याने ते त्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्या हे पाकिस्तानी भारताकडे प्राणाची आणि खाण्याची भीक मागू लागल्यास आश्चर्य वाटू नये !