
गारपिटीमुळे नाशिक येथे कांदा भिजला !
नाशिक – जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी परिसरात दुपारी अचानक वादळी वार्यासह गारपीट झाली आणि पाऊस पडला. पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे, तर कांदा बियाण्यालाही फटका बसला आहे. आंबा बागांमधील फळांचीही हानी झाली आहे. ‘प्रशासनाने तात्काळ हानीग्रस्त भागाचा पंचनामा करावा. हानीग्रस्त शेतकर्यांना साहाय्य द्यावे’, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
राज्यात अतीमुसळधार पावसाची शक्यता !
मुंबई – हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतीमुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. त्यामुळे विदर्भात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ४०-५० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वहाण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यास शेतकर्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे; मात्र हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.