मुंबईत १५ मेनंतर पाणीकपातीच्या निर्णयाची शक्यता

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणार्या ७ प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा केवळ २३ टक्के इतकाच राहिला आहे. त्यामुळे मुंबईत पाणीकपात करावी लागू शकते. १५ मेपर्यंत मुंबईतील ७ प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे जल अभियंता विभागाने सांगितले.
१. मुंबईला प्रतिदिन ३ सहस्र ९५० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. यानुसार मुंबईत वर्षभरासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या या धरणात केवळ ४,११,३५५ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.
२. दक्षतेचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने राज्यशासनाकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव साठा भातसा आणि अपर वैतरणा धरणांतून देण्यास मान्यता दर्शवली आहे.