पहलगाममध्ये आक्रमण करणार्‍या जिहाद्यांवर कठोर सैन्य कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

वाराणसी येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना राष्ट्र आणि धर्म प्रेमी

वाराणसी – उरी, पठाणकोट, पुलवामा या आतंकवादी आक्रमणांच्या वेळी भारताने कठोर प्रत्युत्तर देऊनही काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणे चालू आहेत. नुकतेच पहलगाम येथे २८ हिंदु पर्यटकांची आतंकवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली. हे आक्रमण, म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर झालेले थेट आक्रमण आहे. त्यामुळे भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांवर कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेशातील वाराणसी आणि सैदपुर (गाजीपूर) येथील जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी वाराणसी व्यापार मंडळाचे अध्यक्ष श्री. अजीत सिंह बग्गा, प्रदेश मंत्री श्री. रमेश निरंकारी, विश्व हिंदु महासंघाचे राष्ट्रीय मंत्री अधिवक्ता जितेंद्र कुमार श्रीवास्तव, हिंदु युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पांडे, अधिवक्ता सजीवन यादव, अधिवक्ता मदन मोहन, भारतीय पथ विक्रेता संघाचे अध्यक्ष श्री. आशिष गुप्ता, श्री. रवि श्रीवास्तव, अधिवक्ता विनीत सिंह, अधिवक्ता संजय पांडे, अधिवक्ता अतुल दीक्षित, अधिवक्ता आलोक पांडे, अधिवक्ता विकास सिंह, अधिवक्ता रोहित पाठक, अधिवक्ता दीपक सिंह, अधिवक्ता शशांक पांडे, अधिवक्ता जितेंद्र सिंह, अधिवक्ता यशवंत सिंह, सर्वश्री मोहित मिश्रा, गोपाल पांडे, शुभम मोदनवाल, आशिष श्रीवास्तव, संजय सिंह, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन केसरी, शुभम विश्वकर्मा, सोनू मौर्य, शांती वर्मा, अमित चौरसिया आणि रमेश यादव आदी उपस्थित होते.