संवाद, सहभाग, संवर्धन, संपर्क, सन्मान आणि सहजानंद हे राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचे सूत्र ! – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

पुणे – संवाद, सहभाग, संवर्धन, संपर्क, सन्मान आणि सहजानंद हे राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या कार्यवाहीचे सूत्र आहे. त्या अंतर्गत अनेक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी दिली. ते वक्तृत्त्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘राज्याचे सांस्कृतिक धोरण’ या विषयावर बोलत होते. या वेळी सभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यवाह उपस्थित होते.

आशिष शेलार पुढे म्हणाले की,

१. मानव विकासाच्या उत्क्रांतीचा प्रवास म्हणजे संस्कृती, भाषा, व्यवसाय, धर्म, गुण आणि वर्तणुकीशी तिचा संबंध आहे.

२. भक्तीमार्ग आणि शक्तीमार्ग हे तिचे स्थान आहे, तर देव, दैवत, कुलदैवत, कुलस्वामिनी, लोकगीत, अभंग, पालखी, दिंड्या या विचारधारा तिचे स्वरूप आहे.

३. सांस्कृतिक धोरणाला तंत्रज्ञानाची जोड, गडदुर्ग आणि वारसास्थळांचे संवर्धन, लोककला आणि आदिवासी कलांचे जतन नाट्य अविष्कारांचे बळकटीकरण करत सांस्कृतिक व्याप्ती वाढवणे, ही सांस्कृतिक धोरणाची ठळक गोष्ट आहे.