‘हिदु’ म्हणून एक व्हा !

पहलगाम येथे आतंकवाद्यांनी तेथे पर्यटनासाठी गेलेल्या हिंदूंना ठार मारले. काहींचे ओळखपत्र पडताळले, काहींना ‘कलमा’ वाचायला सांगितला. काहींना ‘हिंदु आहात का  ?’, असे विचारले, म्हणजे ते ‘हिंदु’ असल्याची खात्री केली. यावरून कुठल्याही राज्यातील, कुठल्याही भाषेचा, कुठल्याही जातीचा, कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी करणारा, गरीब किंवा श्रीमंत हिंदु हा आतंकवाद्यांसाठी ‘काफीर’ आहे, हे लक्षात घ्या ! नुकतेच पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यानी एक विधान केले, ‘हिंदु आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत’ आणि त्यानंतर काही दिवसांनी झालेले हे आक्रमण झाले. या सर्व घटनेनंतर केंद्र सरकार कठोर पावले उचलत आहे; पण हिंदु म्हणून आपण वैयक्तिकरित्या यातून काय शिकलो किंवा आपण काय आत्मपरीक्षण केले पाहिजे, हे पहाणे आवश्यक आहे.

जेव्हा जेव्हा एखादा हिंदुत्वनिष्ठ त्यांची प्रखर हिंदुत्वनिष्ठ भूमिका समाजात मांडतात, तेव्हा त्यावर टीका होते. त्यांना ‘कट्टर’ म्हणून हिणवले जाते किंवा त्यांना ‘जातीयवादी’ म्हटले जाते. आता हे प्रमाण बरेच न्यून झाले असले, तरी सर्वधर्मसमभावाचे टीकेचे घोडे धावायचे काही थांबत नाही. त्यामुळे लक्षात घेतले पाहिजे की, शत्रू सर्व हिंदूंकडे केवळ ‘हिंदु काफीर’ म्हणून पहात आहे आणि आपण मात्र जातीपातीत गुंतलो आहोत. राजकारणी याचा लाभ घेऊन आणखीनच जातीयवाद वाढवत आहेत आणि त्यांना सामान्य जनता भुलत आहे.

आतंकवादी संघटनांचे ध्येय, धोरण स्पष्ट आहे, ते म्हणजे इस्लामी राष्ट्र बनवणे आणि त्यासाठी त्यांना पद्धतशीरपणे शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते. त्यांना त्यांच्या धर्मसंस्था प्रतिदिन त्यांचा धर्म शिकवत आहेत. हिंदूंच्या किती मंदिरांमधून किंवा आध्यात्मिक संस्थांकडून त्यांना ‘धर्मशिक्षण’ दिले जाते आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले जाते ? किती हिंदु धर्माचा अभिमान बाळगून धर्माचरण करतात ? तर ही संख्या आता अल्प आहे. धर्मशिक्षणाचा भाग समाजात मांडला, तर त्याविषयी हिंदूंची अनास्था दिसते.

यावरून लक्षात येते की, आतंकवादी हिंदूंकडे ‘हिंदु’ म्हणून बघत आहेत; परंतु हिंदु स्वतःकडेच ‘हिंदु’ म्हणून बघायला सिद्ध नाहीत. त्यांना धार्मिकता नकाे आहे. धर्माची ओळख नको आहे. हिंदूंच्या जिवावर बेतत आहे, तरी त्यांना बेगडी धर्मनिरपेक्षता हवी आहे. आता तरी हिंदूंनी जागृत व्हावे आणि या आक्रमणापासून धडा घेऊन ‘कट्टर हिंदु’ म्हणून एक व्हावे !

– श्री. जयेश बोरसे, पुणे