
एक अत्यंत महत्त्वाचे आणि लक्षणीय, म्हणजे पहलगाम आक्रमणानंतर भारतीय सैन्य प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराला संबोधित करतांना त्यांच्या मागे ‘भगवद्गीते’तील एक श्लोक लिहिलेला फलक ठेवला होता. त्याचा अर्थ ते आपल्या सैनिकांना समजावून सांगत होते. श्रीमद्भगवद्गीतेतील त्या श्लोकाचा अर्थ असा होता, ‘भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात, ‘तू आतापर्यंत शत्रूपक्षाला भरपूर प्रेम आणि शांती दिली.

आता त्यांना युद्ध दे, जे त्याला हवे आहे. त्यांचा समूळ नाश कर, जे त्यांना आवश्यक आहे.’ थोडक्यात काय, तर भारतीय लष्कर आता या स्थितीत आलेले आहे.
– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई (३.५.२०२५)