‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या खोलीत डिसेंबर २०२४ पासून उष्णता जाणवत होती. जानेवारी २०२५ मध्ये ही उष्णता पुष्कळ वाढली. याविषयी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सद्गुरुडॉ. मुकुल गाडगीळ आणि सहकारी यांनी याविषयी संशोधन केले. या संशोधनातील खोलीतील भिंतीचे तापमान आणि सारांश ही सूत्रे ५ मे या दिवशी पाहिली. आज पुढील भाग येथे दिला आहे.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/910232.html

५. जानेवारी २०२५ मध्ये गुरुदेवांच्या खोलीत जाणवलेली लाद्यांची उष्णता फेब्रुवारी २०२५ मध्ये आणखी वाढणे; पण भिंतींची उष्णता तेवढीच रहाणे

५ अ. गुरुदेवांच्या खोलीत जाणवलेली लाद्यांची उष्णता : मी त्या त्या ठिकाणच्या लादीवर उभे राहून ‘मला माझ्या पायांना तळपायांपासून वर कुठपर्यंत उष्णता जाणवली ?’, यांच्या नोंदी मी पुढील सारणीमध्ये केल्या आहेत. लादीची उष्णता अल्प असेल, तर मला ती केवळ माझ्या पावलांना जाणवत होती. जसजशी उष्णता वाढत होती, तसतशी मला माझ्या पायांना वर वर, म्हणजे ‘माझ्या घोट्यांपर्यंत, माझ्या पोटर्यांपर्यंत, माझ्या गुडघ्यांपर्यंत आणि माझ्या मांड्यांपर्यंत’ उष्णता जाणवत होती. त्यावरून ‘लादीची उष्णता अल्प आहे कि अधिक आहे’, याचे अनुमान मी काढत होताे.
बाजूच्या सारणीतून लक्षात येते, ‘गुरुदेवांच्या खोलीतील अभ्यासलेल्या लाद्यांची उष्णता १२.१.२०२५ या दिवशी जेवढी होती, त्याहून ती २७.२.२०२५ या दिवशी, म्हणजे दीड मासांनी (महिन्यांनी) पुष्कळ वाढली आहे.’
५ आ. गुरुदेवांच्या खोलीतील भिंतींची जाणवलेली उष्णता : मी त्या त्या ठिकाणच्या भिंतीसमोर माझा तळहात धरून ‘मला माझ्या चेहर्यावर कपाळापासून खाली कुठपर्यंत उष्णता जाणवली ?’, यांच्या नोंदी मी पुढील सारणीमध्ये केल्या आहेत. यामध्ये उष्णता जसजशी वाढत होती, तसतशी मला माझे कपाळ, नाक, ओठ आणि हनुवटी अशी चेहर्यावर खाली खाली उष्णतेची स्पंदने जाणवत होती. त्यावरून ‘भिंतीची उष्णता अल्प आहे कि अधिक आहे’, याचे अनुमान मी काढत होतो.
वरील सारणीतून लक्षात येते, ‘गुरुदेवांच्या खोलीतील चारही भिंतींची उष्णता १२.१.२०२५ या दिवशी जेवढी होती, तेवढीच ती २७.२.२०२५ या दिवशी, म्हणजे दीड मासांनी (महिन्यांनी) आहे.’
५ इ. सारांश
१. जानेवारी २०२५ च्या तुलनेत फेब्रुवारी २०२५ मध्ये गुरुदेवांच्या खोलीतील लाद्यांची उष्णता वाढण्याचे कारण म्हणजे पाताळातील वाईट शक्तींचे आक्रमण वाढले असणे आणि त्यामुळे त्यांच्याशी गुरुदेवांच्या चाललेल्या सूक्ष्मातील युद्धाची तीव्रताही वाढली असणे.
२. जानेवारी २०२५ मध्ये गुरुदेवांच्या खोलीतील प्रत्येक भिंतीची उष्णता जेवढी होती, तेवढीच ती फेब्रुवारी २०२५ मध्ये असल्याचे लक्षात आले. यावरून ‘या कालावधीत पाताळातील वाईट शक्तींचे आक्रमण जरी वाढलेले असले, तरी भू किंवा भुवर् लोकातील वाईट शक्तींचे आक्रमण वाढलेले नाही’, हे लक्षात येते. पाताळातील वाईट शक्तींचे आक्रमण वाढल्याने लाद्यांची उष्णता वाढली.
३. त्यामुळे ईश्वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना होण्यासाठी जो मुख्य सूक्ष्मातील लढा लढायचा आहे, तो पाताळातील वाईट शक्तींशी लढायचा आहे, हे लक्षात येते.’
(क्रमश:)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.३.२०२५)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |