सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनातील काही भाग ५ मे या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/910219.html

५. मनात विचार येऊ लागल्यावर मनाला अयोग्य विचारांची जाणीव करून देण्यासाठी शिक्षापद्धत अवलंबल्यास काही काळाने वाईट शक्ती त्रास देऊ न शकणे
कु. सोनाली शेट्ये : जेव्हा मी मनात एखादा भाव ठेवते, तेव्हा तो आधी उच्च स्तराचा असतो. नंतर त्याच गतीने वाईट शक्ती येऊन माझ्या मनात पुष्कळ विचार घालतात. तेव्हा माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आता काळच प्रतिकूल आहे. त्याच्याशी लढायचे आहे. तेव्हा ‘अयोग्य विचार आल्यावर नामजप, चिमटा काढून मनाला अयोग्य विचाराची जाणीव करून देणे’, असे सगळे उपाय करायचे. अशी वाईट शक्ती आली, तर आपण नामजपादी उपाय केल्यावर ती दूर जाते. पुढे जाऊन वाईट शक्ती आली, तर तिचे विचार चुकीचे असले, तरी ते एवढे तीव्र नसतात, तर मध्यम असतात आणि नंतर काही मासांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते मंद मंद होत जातात; परंतु त्यासाठी या सर्व कृती कराव्या लागतात. असे सिद्धहस्त (रेडिमेड) मन कुणी आपल्याला देऊ शकत नाही. ज्याला शरीर सुदृढ ठेवायचे आहे, तर त्याला व्यायाम हा करावाच लागतो ना ?
६. सेवा करतांना मनाला आनंद मिळाल्यावर चेहर्यावर आपोआप हास्य येते !
परात्पर गुरु डॉ. आठवले : सत्संगात असलेली एक साधिका करते सगळे चांगले; पण शरीर आणि बुद्धी यांच्या स्तरावर करते. त्यामुळे मनाच्या स्तरावर तिला जो आनंद मिळायला हवा, तो तिला मिळत नाही. तिला मनाच्या स्तरावर आनंद मिळायला लागल्यावर ते हास्य आपोआपच तिच्या चेहर्यावर येईल. नेहमी ‘आतून काय जाणवते ? आनंद वाटतो कि नाही ? ’, हे पहायचे.
७. ‘कुणाला साधना सांगावी ? आणि कुणाला नाही ?’, हे लक्षात येणे महत्त्वाचे आहे !
कु. प्रियांका रवींद्र प्रभुदेसाई : पूर्वी मी एवढी साधना करत नव्हते. दळणवळण बंदीनंतर साधना करायला चालू केले आहे. आता मला पुष्कळ आनंद मिळत आहे. ‘माझे मित्र आणि कार्यालयातील कर्मचारी हे सर्व जण पुष्कळ त्रस्त आहेत. त्यांनाही साधना करून आनंद मिळाला पाहिजे’, असे मला वाटते; पण माझ्यामध्ये असलेले स्वभावदोष आणि साधनेचे प्रयत्न तेवढे होत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : लोकांना शिकवायचे ही समष्टी साधना आहे. आपली आध्यात्मिक पातळी ५० – ६० टक्के झाल्यावर आपल्या वाणीत चैतन्य येते. त्यामुळे दुसर्यांवर परिणाम होेतो. ‘साधना कुणाला सांगायची आणि कुणाला सांगायची नाही ?’, हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जगातील बहुसंख्य लोक साधना इत्यादी शिकण्याला तयार होत नाहीत. त्यामुळे आपला वेळ कशाला व्यर्थ घालवायचा ? आपण जेवढ्या लोकांना ओळखताे, त्यांच्यापैकी ज्या २ – ४ जणांनाच याची आवड असेल, त्यांनाच सांगावे. हिंदु राष्ट्रात सर्व जण चांगलेच असतील !
(क्रमश:)