दुबे यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना गृहयुद्धासाठी ठरवले होते उत्तरदायी !
नवी देहली – भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी वक्फ सुधारणा कायद्यावरून ‘देशात होणार्या सर्व गृहयुद्धांसाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे पूर्णपणे उत्तरदायी आहेत आणि धार्मिक युद्ध भडकावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे उत्तरदायी आहे’, असे विधान १९ एप्रिल या दिवशी केले होते. यावरून त्यांच्याविरोधात माजी पोलीस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी सर्वाेच्च न्यायायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करून कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्यावर ५ मे या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने ही याचिकाच फेटाळली. सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले की, आमचे खांदे भक्कम आहेत, आम्हाला याचिकेवर विचार करायचा नाही. आम्हाला सध्या कोणताही युक्तीवाद किंवा वादविवाद ऐकायचा नाही; परंतु आम्ही एक छोटासा आदेश देऊ.