नागरिकांच्या तक्रारी न सोडवल्यास कारवाई करण्याचा ‘पी.एम्.आर्.डी.ए.’ प्रशासन विभागाचा आदेश !

पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (‘पी.एम्.आर्.डी.ए.’मध्ये)  येणार्‍या नागरिकांना वेळेत भेटून त्यांच्या समस्या, तक्रारी सोडवा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा सूचना ‘पी.एम्.आर्.डी.ए.’ प्रशासन विभागाने अधिकार्‍यांना दिल्या आहेत. ‘पी.एम्.आर्.डी.ए.’अंतर्गत येणार्‍या ९ तालुक्यांतून नागरिक, ग्रामस्थ हे विविध कामांसाठी येत असतात; मात्र अधिकारी न भेटल्याने नागरिकांना कामे पूर्ण न होताच परतावे लागते. त्यामुळे आयुक्त योगेश म्हस्के यांनी नागरिकांना भेटण्यासाठी अधिकार्‍यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. सोमवार ते गुरुवार या ४ दिवसांत संबंधित विभागाचे मुख्य अधिकारी, साहाय्यक नगररचनाकार, इतर विभागांतील उपायुक्त आणि कार्यकारी अभियंते नागरिकांसाठी उपलब्ध असतील.

संपादकीय भूमिका

कामचुकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांना शिक्षा होणे अपेक्षितच आहे !