India Must Teach ‘Failed Nation : पाकिस्तानला समजवण्याची नाही, तर धडा शिकवण्याची वेळ ! – खासदार असदुद्दीन ओवैसी

खासदार असदुद्दीन ओवैसी

भाग्यगनर (तेलंगाणा) – सरकार पाकिस्तानला जोरदार उत्तर देईल. आतंकवाद संपवण्यासाठी भारत कठोर पावले उचलणार आहे. आतंकवाद्यांनी निर्दोष पर्यटकांची हत्या केली. त्यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही पाकिस्तानमधील राजकारणी पुरावे मागत आहेत. पाकिस्तानला यापूर्वीही पठाणकोट, मुंबई आक्रमणांविषयी पुरावे दिले होते; परंतु पाकिस्तानने काहीच कारवाई केली नाही. पाकिस्तान निर्लज्ज राष्ट्र आहे. त्यामुळे त्याला समजवण्याची नाही, तर शिक्षा देण्याची वेळ आली आहे. अन्यथा प्रत्येक २-४ महिन्यांत त्याच्याकडून सामान्य लोकांची हत्या होईल, असे विधान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (ए.आय.एम्.आय.एम्. – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

 

ओवैसी पुढे म्हणाले की, पहलगाममध्ये मृत्यू झालेल्यांना सरकारने हुतात्म्यांचा दर्जा दिला, तर त्यांच्या परिवाराचा योग्य सम्मान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना हुतात्म्यांचा दर्जा देण्याच्या संदर्भात पावले उचलावीत, अशी विनंती आहे.

संपादकीय भूमिका

केवळ पाकिस्तानीच नाही, तर भारतातील पाकप्रेमी, तसेच जिहादी मुसलमान यांनाही सरकारने धडा शिकवण्याची वेळ आली आहे !