|

जम्मू – भारताने पाकिस्तानवर राजनैतिक बंधने लादून मोठी कारवाई चालू केली आहे. चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह थांबवल्यानंतर आता सलाल धरणातूनही पाणी थांबवण्यात आले आहे. याखेरीज झेलम नदीवर बांधलेल्या किशनगंगा धरणाच्या संदर्भातही अशाच प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. सिंधू पाणी करार रहित केल्यानंतर भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानवर उपासमारीची वेळ येणार आहे.
🚨 Chenab runs dry near Pakistan!
🇮🇳 Shuts sluice gates of Salal & Baglihar dams after Pahalgam terror attack
🌊 Water dips below waist level in J&K’s Akhnoor — locals stunned!
⚡️ Part of India’s diplomatic offensive against 🇵🇰 #IndiaPakistanWar pic.twitter.com/BhdNqpzQ59
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2025
१. पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने ‘सिंधू पाणी करार’ रहित करण्याचा निर्णय घेतला. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेला ‘सिंधू पाणी करार’ हा वर्ष १९६० पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू नदी अन् तिच्या उपनद्या यांच्या वापराचे नियमन करत आहे.
२. रामबन जिल्ह्यातील बगलिहार धरण हा दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून वादाचा विषय आहे. पाकिस्तानने यापूर्वीही जागतिक बँकेकडे मध्यस्थीची मागणी केली होती.
३.भारतीय अधिकारी अखनूर येथून आणखी एक मोठा कालवा बांधण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे जम्मू जिल्ह्यातील रामगडसह उर्वरित भाग, तसेच सांबा आणि कठूस जिल्ह्यांचा काही भाग सिंचनासाठी उपलब्ध होईल.
४. अखनूर, जौरियन आणि खौर परिसरातील काही भागांतून येणार्या जुना प्रताप कालवा पुढे नेण्याची आणि पाणी शेवटच्या टोकाकडे वळवण्याची शक्यताही पडताळली जात आहे.
५.परगलवाल सेक्टर, तसेच घरोटा आणि कोट भालवालच्या कांडी पट्ट्यातील अनुमाने ३५ गावांना चिनाब नदीच्या पाण्याचा लाभ देण्याची योजना आहे, असे सूत्रांनी सांगितले.