बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचे विधान

नवी देहली – युरोपमधील चर्च संग्रहालयात रूपांतरित झाले आहेत; परंतु मुसलमान सर्वत्र मशिदी बांधण्यात व्यस्त आहेत. सध्या सहस्रो मशिदी आहेत आणि त्यांना आणखी मशिदी बांधायच्या आहेत. त्यातून जिहादी निर्माण होतात. मदरसे नसावेत. इस्लाम अस्तित्वात असेपर्यंत आतंकवाद अस्तित्वात राहील. मुसलमान मुलांनी केवळ एकच नाही, तर सर्व पुस्तके वाचली पाहिजेत, अशी विधाने बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केली.
Bangladeshi writer Taslima Nasrin states: "As long as Islam exists, terrorism will exist!" 🤔
Interesting to note the different reactions if such a statement came from someone of a different faith.
Where is the outcry? 📢
PC: @BNHindiBreaking pic.twitter.com/lDmgD8rrx2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2025
तस्लिमा नसरीन पुढे म्हणाल्या की,
१. इस्लामचा विकास १ सहस्र ४०० वर्षांतही झालेला नाही. जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत इस्लाम आतंकवाद्यांना जन्म देत राहील.
२. वर्ष २०१६ च्या ढाका येथील आक्रमणात मुसलमानांना ‘कलमा’ (अल्लाचे कौतुक करणारी वाक्य) म्हणता येत नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली. जेव्हा श्रद्धेला तर्क आणि मानवता यांवर मात करण्याची अनुमती दिली जाते, तेव्हा असेच घडते.
३. मी अमेरिकेची कायमची रहिवासी आहे. मी तिथे १० वर्षे राहिले; पण मला नेहमीच बाहेरच्यासारखे वाटायचे. कोलकात्यात आल्यानंतरच मला घरी असल्यासारखे वाटले. बंगालमधून हाकलून दिल्यानंतरही मला देहलीत दुसरे घर सापडले. या देशाने मला आपलेपणाची भावना दिली आहे, जी माझा स्वतःचा देश मला देऊ शकला नाही.
४. प्रत्येक सुसंस्कृत देशात एकसमान नागरी संहिता असली पाहिजे. अगदी भारतातही. मी त्याचे समर्थन करते. इस्लामी धर्मगुरूंना कुराणचा अधिकार हवा आहे. अधिकार कधीही धार्मिक नसावेत.
संपादकीय भूमिकाअसे जर एखाद्या हिंदूने विधान केले असते, तर एव्हाना त्याच्यावर मुसलमानद्वेषी, अशांततावादी, धर्मनिरपेक्षताविरोधी आदी आरोप करत त्याच्यावर टीका झाली असती ! एक मुसलमान महिलाच असे म्हणत आहे आणि धर्मनिरपेक्षतावादी यावर गप्प आहेत ! |