वाशीतील बाजारात अमली पदार्थ !
नवी मुंबई – वाशीतील बाजार समितीमध्येही अमली पदार्थांचे जाळे पसरलेले असल्याचा आरोप माथाडी कामगारांच्या नेत्यांनी केला आहे. चरस, गांजा, अफिमसारखे अमली पदार्थ बाजारात अगदी सहज मिळतात. परराज्यातून आणि आयात मालाच्या माध्यमातून हे पदार्थ बाजारात येतात आणि इथल्या पानटपरीवर, काही ठराविक लोकांच्या अड्ड्यावर ते विकले जातात, असे त्यांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांना हे ठाऊक नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! |
राज्यात पुढील ३-४ दिवस पाऊस
मुंबई – पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील काही भागात वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकण आणि विदर्भ येथील प्रदेशांचा समावेश आहे.
राजूर (अहिल्यानगर) येथे काविळीची साथ
अहिल्यानगर – राजूर गावात गेल्या १५ दिवसांपासून काविळीची साथ मोठ्या प्रमाणात आली आहे. यात २ जणींना जीव गमवावा लागला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णांची भेट घेऊन आढावा घेत परिस्थिती जाणून घेत सूचना केल्या आहेत.
नागपूर येथे सर्वांत मोठे चित्रपटगृह उभारणार
नागपूर – जगातील सर्वांत मोठा पडदा असणारे चित्रपटगृह उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा ‘वेव्हज् २०२५’ परिषदेमध्ये करण्यात आली. प्रसिद्ध निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या या प्रकल्पाने भारताला जागतिक मनोरंजन केंद्र करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे चित्रपटगृह चित्रपटप्रेमींना अविस्मरणीय अनुभव देईल, असे ते म्हणाले.
‘समृद्धी’वर प्रवाशांना लुटले !
मुंबई – समृद्धी महामार्गावर एका डॉक्टर दांपत्याच्या चारचाकी गाडीसमोर दुसरी चारचाकी आडवी घालून ४ दरोडेखोरांनी त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने आणि भ्रमणभाष असा सुमारे ११ लाख १२ सहस्र रुपयांचा ऐवज लुटला. रात्री १०.१० ते १०.२० च्या सुमारास ही घटना घडली.
संपादकीय भूमिकामहामार्गावरील लुटमारीवर प्रशासन कसा वचक ठेवणार ? |
सीईटीची फेरपरीक्षा !
मुंबई – १२ वीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या सीईटी या परीक्षेत गणिताच्या गुणांकनाच्या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्याने ही परीक्षा परत घेतली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. ५ मे या दिवशी बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित होणार आहे.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार्या परीक्षेत अशा अडचणी कशा निर्माण होतात ? |