‘उजनी’तील वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात लढा देण्याचा नागरिकांचा निर्धार !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – उजनीतील वाढत्या जलप्रदूषणावरून पुन्हा एकदा निर्णायक लढा उभारण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. या लढ्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील उजनी नदीकाठचे नागरिक एकत्रित येत आहेत. प्रदूषणासाठी आता आरपार लढण्याचा निर्णय भिगवण येथील पूर्व नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे. (नागरिकांना प्रदूषणाच्या विरोधात आंदोलन का करावे लागते ? प्रशासन कधी काम करणार ? – संपादक) १६ मे या दिवशी ‘जलपुरुष मॅगसेसे’ पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह हे पुन्हा एकदा उजनीला भेट देऊन या लढ्यात सहभागी होणार आहेत. भिगवण येथील ‘मराठा महासंघा’च्या कार्यालयात जल अभ्यासक नरेंद्र चुघ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात उजनी प्रदूषण विरोधातील लढ्याची पुढील रणनीती आखण्यात आली.