‘मराठ्यांचे उपेक्षित साम्राज्य’ या विषयावर व्याख्यान

पुणे – मराठ्यांनी अखंड हिंदुस्थानाची संकल्पना सर्वप्रथम मांडली; मात्र ब्रिटीश इतिहासकारांनी खोडसाळपणे त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या कार्याच्या नोंदी टाळल्या. त्यामुळे मराठ्यांचा पहिल्या टप्प्यातील इतिहास दुर्लक्षित राहिला. ब्रिटिशांनी भारतीय मराठ्यांनी ‘लुटारू’ म्हटले. मराठ्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून मोगलांना मोठे केले. मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा पुसल्या. सुरूंग लावून गड-दुर्ग पाडले, असे मत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ‘वक्तृत्वोत्तेजक सभे’च्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेमध्ये ‘बाजीराव पेशवे स्मृती व्याख्यान’ पुष्प गुंफतांना ‘मराठ्यांचे उपेक्षित साम्राज्य’ या विषयावर झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
ते म्हणाले की, न्या. महादेव रानडे, वि.का. राजवाडे यांनी मराठ्यांचा पराक्रमी इतिहास मांडला. ब्रिटीश आले नसते, तर संपूर्ण देशावर मराठ्यांचे राज्य असते, असे काही प्रामाणिक ब्रिटीश लेखकांनी लिहिले आहे. मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला. पानिपतचा पराभवही मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. त्यानंतर अब्दाली कधीच भारतात येऊ शकला नाही.