वर्षभरात विनातिकीट रेल्वेप्रवास करणार्‍यांकडून १९ कोटी रुपये दंड वसूल !

पुणे – पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या स्थानकांवरून रेल्वेगाडीमध्ये विनातिकीट प्रवास करणार्‍या ३ लाख ६० सहस्र ७८५ प्रवाशांकडून वर्षभरात १९ कोटी ३ लाख ६३ सहस्र ७८५ रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये आरक्षित शयनयान बोगीतून विनातिकीट प्रवास करणार्‍या ६७ सहस्र प्रवाशांकडून ३ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. क्षमतेपेक्षा अधिक साहित्य नेणार्‍यांकडून ७ लाख ७३ सहस्र रुपये दंड वसूल केला. प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा, अन्यथा रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. ही कारवाई चालूच रहाणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहेरा (पुणे विभाग) यांनी सांगितले.