काश्मीर खोर्‍यातील पर्यटन आणि आतंकवाद !

जम्मू-काश्मीर राज्याची प्रामुख्याने काश्मीर खोर्‍याची अर्थव्यवस्था ही ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रहित झाल्यापासून तेथे पर्यटनाने विक्रमी उच्चांक गाठलेला आहे. आतंकवादी आक्रमणांमध्ये फार प्रमाणात न्यूनता आली आहे. तेथील जनतेने मागील काही वर्षांत अनेक प्रमाणात पैशांची कमाई केली. पहलगाम येथे झालेले आतंकवादी आक्रमण हा त्या सर्व पर्यटनावर आणि त्यांना मिळणार्‍या आर्थिक साहाय्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम घडवून आणू शकतो. इतकेच नव्हे, तर उपासमारी आणि भूकमारीचीही वेळ काश्मिरी जनतेवर येऊ शकेल. भारतातील अन्य भागांमध्ये पर्यटकांना फिरण्याकरता अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत; परंतु काश्मिरी जनतेला पर्यटनाविना स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्याकरता कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तरीही त्या सर्वांचा आतंकवाद्यांना पाठिंबा असणे क्रमप्राप्त आहे; कारण स्थानिक लोकांच्या साहाय्याविना इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रमण करणे केवळ अशक्य गोष्ट आहे.

अधिवक्ता अनेश परळकर

तेथे धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या आणि आता पहलगाम येथील स्थानिक जनता मेणबत्ती मोर्चा काढून कथित स्वरूपात सर्व प्रकरणाचा निषेध करत आहेत. ही ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) त्यांनी निर्माण केलेली आहे. पर्यटकांनी तेथे जाणे बंद केले, तर काय अवस्था होऊ शकेल, याची कल्पना तेथील स्थानिक जनतेला आहे. असे असतांनाही इतका धर्मांधपणा त्यांच्या नसानसांत भिनला आहे, हे अत्यंत भयावह आहे.

– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई (२.३.२०२५)