श्री श्री रविशंकर हे जागतिक स्तरावर आदरणीय आध्यात्मिक आणि मानवतावादी नेते आहेत. त्यांनी तणावमुक्त, हिंसाचारमुक्त समाजासाठी जागतिक चळवळीचे अभूतपूर्व नेतृत्व केले आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ (जीवन जगण्याची कला) आणि ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज’ यांसारख्या संघटनांच्या माध्यमातून १८० देशांमध्ये अनेक कार्यक्रम आणि उपक्रम यांद्वारे श्री श्री रविशंकर हे आतापर्यंत ८० कोटी लोकांपर्यंत पोचले आहेत. जागतिक, राष्ट्रीय, सामुदायिक आणि वैयक्तिक पातळीवर आव्हानांना तोंड देण्यासाठी लोकांना सक्षम आणि सिद्ध करण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी अद्वितीय, प्रभावी कार्यक्रम विकसित केले आहेत.
वर्ष १९५६ मध्ये दक्षिण भारतात जन्मलेले श्री श्री रविशंकर एक प्रतिभावान बालक होते. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी भगवद्गीता आणि प्राचीन संस्कृत धर्मग्रंथ यांचे वाचन केले होते. लहान वयातच ते अनेकदा ध्यान लावत. त्यांनी वैदिक साहित्य आणि भौतिकशास्त्र यांत शैक्षणिक पदव्या मिळवल्या आहेत. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा येथे १० दिवसांचा मौन कालावधी पाळला. त्यातूनच ‘सुदर्शन क्रिया’ या शक्तीशाली श्वसन तंत्राचा जन्म झाला. कालांतराने सुदर्शन क्रिया ही ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या अभ्यासक्रमांचा केंद्रबिंदू बनली.
विशेष लेख
१. संघटनांची स्थापना
वर्ष १९८१ मध्ये श्री श्री रविशंकर यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’ची स्थापना केली. ही एक शैक्षणिक संस्था असून ती १८० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. फाऊंडेशनचे वैयक्तिक विकास कार्यक्रम तणाव दूर करण्यासाठी आणि कल्याणाची भावना वाढवण्यासाठी शक्तीशाली माध्यम उपलब्ध करून देतात.
वर्ष १९९७ मध्ये त्यांनी ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज’ ची स्थापना केली, जी एक मानवतावादी संस्था आहे, जी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवी मूल्ये यांना प्रोत्साहन देते.
‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’ या दोन्ही संघटना संघर्ष निराकरण, आपत्ती आणि आघात मदत, पर्यावरण संवर्धन, भ्रष्टाचारविरोधी, कैदी पुनर्वसन, युवा नेतृत्व, महिला सक्षमीकरण आणि सार्वत्रिक शिक्षण यांसारख्या मानवतावादी उपक्रमांना सहकार्य करतात. दोन्ही संस्थांना संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेकडून विशेष सल्लागार दर्जा देण्यात आला आहे.
२. श्री श्री रविशंकर यांना मिळालेले पुरस्कार

श्री श्री रविशंकर यांना जगभरातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात कोलंबिया, मंगोलिया, पॅराग्वे, सुरीनाम आणि फिजी या देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांचा समावेश आहे.

भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान केला आहे. त्यांना जागतिक स्तरावर २७ मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत. ते प्रतिवर्षी जवळजवळ ४० देशांमध्ये प्रवास करतात.
३. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य

गुरुदेवांनी जागतिक स्तरावर शांतता वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतातील काश्मीर, आसाम आणि बिहारपासून ते कोलंबिया, कोसोवो, इराक आणि सीरिया अन् कोट डी आयव्होर येथे सशस्त्र संघर्षात सहभागी असलेल्या लोकांनी शांतीचा मार्ग अवलंबण्यात श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमांचा प्रभाव आहे. वाढता हिंसाचार आणि संघर्ष यांनी ग्रासलेल्या जगात गुरुदेव आणखी एक मार्ग सांगतात, जिथे व्यक्तीला स्वतःमध्ये शांती मिळते आणि जी समाजात शांती अन् सौहार्द यांचे स्रोत बनते. उदाहरणार्थ वर्ष २००३ पासून सहस्रो इराकी लोकांना ‘आघात मदत कार्यक्रमां’चा लाभ झाला आहे.
राष्ट्रीय-सामुदायिक पातळीवर श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमांनी प्रमुख सामाजिक समस्यांना तोंड देण्याचा प्रयत्न केला आहे, उदा. अमेरिकेत ‘युवा सक्षमीकरण कार्यक्रमा’च्या अंतर्गत शहरे आणि शाळा येथील टोळी हिंसाचार, अमली पदार्थ आणि दारू यांच्या व्यसनाच्या समस्या सोडवत आहेत. प्रसिद्ध ‘प्रोजेक्ट वेलकम होम ट्रूप्स’ने अमेरिकन युद्धातील माजी सैनिकांसाठी जीवन पालटणारी आघातमुक्ती प्रदान केली आहे.
४. भारतातील कार्य

अ. भारतात अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या न्यायालयीन लढ्यात वर्ष २००१-०२ मध्ये आणि वर्ष २०१७ पासून सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यात ते सहभागी झाले होते. त्यांचे शांतीकार्य पाहून सर्वोच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमी न्यायालयीन प्रकरण सोडवण्यासाठी ३ मध्यस्थांपैकी एक म्हणून त्यांना नियुक्त केले. ५०० वर्षांचा हा लढा शेवटी वर्ष २०१९ मध्ये संपला.
आ. सार्वजनिक जीवनात नीतीमत्ता पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (भ्रष्टाचाराच्या विरोधात भारत) आणि ‘वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस’ (व्यवसायातील नीतीमत्तेसाठी जागतिक मंच) सारख्या चळवळींचे नेतृत्व केले आहे आणि त्यांना पाठिंबा दिला आहे.
इ. त्यांनी भारतातील दुर्गम भागात १ सहस्र ३२७ हून अधिक शाळा चालू केल्या असून तेथे वंचितांना विनामूल्य शिक्षण दिले जाते. या शाळांमध्ये सध्या १ लाखाहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत.
ई. पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील ७५ नद्या आणि सहस्रो जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले जात आहे, तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या स्वयंसेवकांनी आतापर्यंत जगातील ३६ देश आणि भारतातील २६ राज्यांमध्ये १० कोटींहून अधिक झाडे लावली आहेत.
कारागृह पुनर्वसन
६० देशांमध्ये चालू असलेल्या या कार्यक्रमामुळे ८ लाख बंदीवानांचे जीवनमान पालटले आहे. भारतातील कारागृहांमधील ३ लाख ५० सहस्रांहून अधिक बंदीवानांनी या कार्यक्रमात भाग घेतला आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या तिहार कारागृहातील ६० सहस्रांहून अधिक दोषी आणि १३० कारागृह कर्मचार्यांना या कार्यक्रमाचा लाभ झाला आहे.
आत्महत्या निवारण कार्यशाळा आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण यांद्वारे अतिरेकी संघटनांमधील ७ सहस्र ४०० सशस्र बंडखोरांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
उ. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीने कारागृहातील बंदीवानांचे पुनर्वसन करण्यास साहाय्य करण्यात येते. जगभरातील ८ लाखांहून अधिक बंदीवानांपर्यंत हे कार्य पोचले असून बंदीवानांना त्याचा लाभही होत आहे. उरुग्वे देशात तेथील गृह मंत्रालयाने ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’द्वारे कारागृहात घेतलेल्या उपक्रमात सहभागी बंदीवानांच्या कारावासाची शिक्षा न्यून केली आहे.
ऊ. मेक्सिको, हैती, अमेरिका, जर्मनी, कॅनडा, नेपाळ, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, जपान यांसारख्या देशांतील आपत्तीबाधित क्षेत्रातील आपत्ती निवारणासाठी श्री श्री रविशंकर यांच्या स्वयंसेवकांची विशाल जागतिक संपर्क यंत्रणा एकत्रितपणे कार्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
५. ‘जागतिक संस्कृती महोत्सवा’चे आयोजन
धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक विभाजनांनी विखुरलेल्या जगात गुरुदेवांचा व्यापक संदेश असा आहे की, जग एक कुटुंब आहे आणि विविध धर्म, संस्कृती अन् परंपरा प्रेम, करुणा, शांती अन् अहिंसा या समान मानवी मूल्यांमध्ये रूजलेल्या आहेत. या दृष्टीकोनातून त्यांनी ऐतिहासिक ‘जागतिक संस्कृती महोत्सवा’चे आयोजन केले.
‘जागतिक संस्कृती महोत्सव’२०१६२०२३ |
या महोत्सवात २५ सहस्रांहून अधिक धार्मिक आणि आध्यात्मिक नेत्यांनी भाग घेतला होता. जगभरातील विविध संस्कृती आणि पार्श्वभूमी असलेल्या ६२ सहस्रांहून अधिक कलाकारांनी यात सादरीकरण केले. त्याद्वारे ७० लाखांहून अधिक लोकांनी एकत्र येऊन सर्व धर्म आणि संस्कृती यांच्या विविधतेचा उत्सव साजरा केला.
६. श्री श्री रविशंकर त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून जगभरात करत असलेले कार्य
१८० हून अधिक देशांमध्ये ४४ वर्षांहून अधिक काळ ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’ आणि ‘आय.ए.एच्.व्ही.’ या संघटनांनी पुढील कार्य केले आहे –
अ. ८० कोटींहून अधिक लोक या संघटनांशी जोडले गेले आहेत.
आ. जगभरात १०० कोटींहून अधिक झाडे लावली आहेत.
इ. ‘कारागृह कार्यक्रमा’द्वारे कारागृहातील ८ लाखांहून अधिक बंदीवानांचे जीवन पालटले.
ई. भारत, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथे ‘युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम’ राबवून तेथील ३ लाखांहून अधिक ग्रामीण तरुणांना प्रशिक्षित केले.
श्री श्री रविशंकर यांच्या स्वयंविकास कार्यक्रमांमुळे जगभरातील लाखो लोक जीवनात तणावमुक्ती, शांतता आणि आरोग्याची चांगली स्थिती अनुभवत आहेत. हे कार्यक्रम आधुनिक आवश्यकतांनुसार सिद्ध केलेल्या प्राचीन योगतंत्रांवर आधारित आहेत. नामांकित वैद्यकीय संस्थांकडून करण्यात आलेल्या स्वतंत्र वैद्यकीय संशोधनात या योगतंत्रांमुळे नैराश्य न्यून होणे, तणाव निर्माण करणारे शरिरातील ‘कोर्टिसोल’ संप्रेरक न्यून होणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आदी चांगले परिणाम नोंदवण्यात आले आहेत.
उ. आतापर्यंत १ लाख ६५ सहस्रांहून अधिक विनामूल्य तणावमुक्ती कार्यशाळा आयोजित केल्या आहेत, ज्यामुळे ५६ लाख ८८ सहस्रांहून अधिक लोकांना लाभ झाला आहे.
ऊ. ३ सहस्र ८१९ हून अधिक घरे, ६२ सहस्र शौचालये, १ सहस्र २०० बोअरवेल, तसेच १ सहस्र बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत.
ए. १ लाखाहून अधिक स्वच्छता शिबिरे आयोजित केली असून त्यामुळे ७८ लाख ६९ सहस्र ९०० लोकांना लाभ झाला आहे, तसेच २७ सहस्र ४२७ वैद्यकीय शिबिरे आयोजित केली असून त्यामुळे ५ लाख ७७ सहस्र ४०० लोकांना लाभ झाला आहे.
ऐ. आरोग्य (हेल्थ), स्वच्छता (हायजीन), घरे (होम), सुसंवाद (हार्मनी), मानवी मूल्ये (ह्युमन व्हॅल्यू) या ‘५ एच्’ कार्यक्रमांमुळे आतापर्यंत ७० सहस्र गावांमध्ये पोचले.
ओ. २२ राज्यांमधील २२ लाखांहून अधिक शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले.
औ. १ लाख ६५ सहस्रांहून अधिक लोकांना ग्रामीण विद्युतीकरणाचा लाभ करून दिला. ‘लाईट अ होम’ प्रकल्पांतर्गत ७०० हून अधिक गावे दत्तक घेतली.
अं. भारतातील २ सहस्र ३२ गावांमधील १ सहस्र २६२ हून अधिक विनामूल्य शाळांमधील १ लाखांहून अधिक मुलांना शिक्षण दिले.
क. ‘येस ! फॉर स्कूल्स’ कार्यक्रमाद्वारे अमेरिकेतील २२५ शाळांमधील १ लाख २० सहस्र विद्यार्थ्यांना आणि ‘एस्.के.वाय. कॅम्पस’ कार्यक्रमांद्वारे १०१ विद्यापिठांमधील १ लाख २७ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.
निर्वासित आणि युद्धांतील माजी सैनिकांचे पुनर्वसन
विविध युद्धांतील ८ सहस्रांहून अधिक माजी सैनिकांना ‘सुदर्शन क्रिया योग’मुळे ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर’चा (शारीरिक किंवा मानसिक धक्का बसल्यानंतर येणार्या तणावाचा) सामना करण्यास साहाय्य झाले.
सुदर्शन क्रिया कैसे करें ?
इराक, इस्रायल-पॅलेस्टाईन, सीरिया, जॉर्डन, लेबनॉन, किर्गिस्तान, श्रीलंका, बाल्कन आणि अफगाणिस्तान या देशांमधील युद्धातील वाचलेल्या १ लाख ५० सहस्रांहून अधिक जणांनाही याचा लाभ झाला.
७. भारतातील आर्ट ऑफ लिव्हिंग सेवा प्रकल्पांचा आढावा
अ. कोविड प्रतिसाद
१. कोरोना महामारीच्या काळात प्रत्यक्ष आरोग्य कार्य करणार्या ४३ सहस्र ३९० हून अधिक कर्मचार्यांपर्यंत मानसिक आरोग्य कार्यक्रमांद्वारे पोचले.
२. १३ मे २०२० पर्यंत भारतातील २.५ दशलक्षांहून अधिक कुटुंबांना ७ कोटी ५१ लाख २२ सहस्र ६९ हून अधिक जेवणसंख्या पुरवली.
आ. साक्षरतेसाठीचे प्रयत्न : भारतातील २ सहस्र ३२ गावांमधील १ सहस्र ३२७ हून अधिक शाळांमधील १ लाखांहून अधिक मुलांना विनामूल्य शालेय शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले. या शाळांमध्ये मुली आणि मुले यांचे प्रमाण सुमारे ४८:५२ असे आहे.
इ. पर्यावरणाशी संबंधित कार्य
१. वृक्षारोपण : ३६ देश आणि भारतातील २६ राज्यांमध्ये १०० दशलक्ष झाडे लावली.
३. ‘मिशन ग्रीन अर्थ’च्या पुढाकाराने ९ दशलक्ष झाडे लावली. संपूर्ण भारतात ३,८७०,७६०+ पेक्षा जास्त लक्ष्मीतरू (सिमारुबा ग्लाऊका) रोपांची लागवड. पारंपरिक औषधांमध्ये, कर्करोग आणि ‘ट्यूमर’च्या (गाठींच्या) उपचारांमध्ये ‘लक्ष्मीतरू’चा काढा वापरला जातो.
८. नैसर्गिक शेती
परिसंवाद, प्रशिक्षण कार्यशाळा, शेतीच्या प्रतिकृतींना (मॉडेल फार्म) भेटी देणे, जागरूकता कार्यक्रम आणि कृषी, शेतकरी मेळावे यांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वयंसेवकांनी भागधारकांशी संपर्क साधला. नैसर्गिक शेतीविषयी ३ दशलक्षांहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. स्थानिक जातींच्या बियाण्यांच्या जतनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात ‘बियाणे बँकां’ची स्थापना करण्यात आली.
९. जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवन

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तमिळनाडू, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमधील ७५ नद्यांमध्ये जलसंधारण अन् नदी पुनरुज्जीवन उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ७ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. यांमुळे तेथील प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढली आहे.
१०. कचरा व्यवस्थापन
आतापर्यंत ठिकठिकाणी १८ कचरा व्यवस्थापन संयंत्रे बसवली, ज्याद्वारे प्रत्येक वर्षी ४.२३४ दशलक्ष किलो कचर्यावर प्रक्रिया केली जाते.
११. स्वच्छता आणि वैद्यकीय शिबिरे
१ लाखांहून अधिक स्वच्छता शिबिरे आयोजित केली गेली. याचा ७८ लाख ६९ सहस्र ९०० लोकांना लाभ झाला. २७ सहस्र ४२७ वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत स्वयंसेवकांद्वारे ५५ आदर्श गावे विकसित केली जात आहेत. त्याचप्रमाणे ३ सहस्र ८१९ घरे, ६२ सहस्र शौचालये, १ सहस्र २०० बोअरवेल्स आणि १ सहस्र बायोगॅस संयंत्रे बांधण्यात आली आहेत.
१२. ग्रामीण विकास कार्यक्रम
स्वयंसेवकांद्वारे आतापर्यंत १ लाखांहून अधिक स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या.
- ‘द लाईट अ होम’ (घराला प्रकाश द्या) या प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेश, मणीपूर, मेघालय, आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, मध्यप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतील आदिवासी भागांतील ७५८ गावांमधील १ लाख ६६ सहस्र १०० हून अधिक लोकांना सौरप्रकाशाचा लाभ झाला आहे.
- भारतातील ग्रामीण भागातील १९० शाळांमध्ये सौरऊर्जा निर्मितीचे साहित्य प्रदान करण्यात आले. ५ सहस्रांहून अधिक युवकांनी अक्षय ऊर्जा उत्पादने निर्माण करण्यासाठी अक्षय ऊर्जा तंत्रज्ञ म्हणून प्रशिक्षण घेतले. ‘सोलर बॅटरी चार्जिंग स्टेशन’ स्थापित करण्यासाठी सौरऊर्जेच्या क्षेत्रात ९८ नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळाली.
१३. कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम
१४ वर्षांत २३ राज्यांमधील ५०० हून अधिक जिल्ह्यांमधील ४ लाख २० सहस्रांहून अधिक युवकांना विविध व्यावसायिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण दिले. त्याअंतर्गत ४८ हून अधिक पदांसाठी १०३ कौशल्य विकास केंद्रे चालू केली.
१४. महिला शक्ती
विविध उपक्रमांद्वारे १ लाख ११ सहस्रांहून अधिक ग्रामीण महिलांपर्यंत पोचले. ५ सहस्र ग्रामीण महिलांना व्यावसायिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण दिले. ओडिशा आणि आसाम या राज्यांमध्ये शिवणकाम प्रशिक्षण केंद्रांची स्थापना केली.
- अन्न प्रक्रिया, पिशवी बनवणे, शिवणकाम आणि भरतकाम, उदबत्ती बनवणे या क्षेत्रांत ६२३ हून अधिक स्वयंसाहाय्य गटांची स्थापना केली. भारत, श्रीलंका, नेपाळ, कंबोडिया, भूतान आणि आफ्रिका या देशांत ५ सहस्र ९१० हून अधिक प्रशिक्षकांनी ‘पवित्र’ प्रकल्पांतर्गत आयोजित केलेल्या मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छता कार्यशाळांचा लाभ १ लाख १५ सहस्र ८०० हून अधिक मुलींना मिळाला.
- मुंबई आणि बेंगळुरूमधील ७०४ हून अधिक महिलांना ‘शक्ती’ प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. हा प्रकल्प महिलांना त्यांच्या उद्योजकीय भावनेला चालना आणि आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने सक्षम बनवण्याचा एक नवीन उपक्रम आहे.
१५. ‘बूंद’ (थेंब) – शुद्ध पेयजल
कमी किमतीचे ‘बायो सँड वॉटर फिल्टर’ तयार करण्यासाठी ६० ग्रामीण तरुणांना ‘जलसेवक’ म्हणून प्रशिक्षित केले. आंध्रप्रदेश, बंगाल, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये ४५ सहस्रांहून अधिक लोकांना सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवले. कर्नाटक आणि बंगालमध्ये ७ सामुदायिक ‘आरओ आणि बायो सँड फिल्टरची स्थापना’ केली.
१६. नशामुक्त भारत अभियान
गेल्या २५ वर्षांपासून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ व्यक्तींना व्यसनांवर मात करण्यासाठी साधने पुरवत आहे. वर्ष २०१९ मध्ये श्री श्री रविशंकर यांनी औपचारिकपणे ‘अमली पदार्थमुक्त भारत’ ही महामोहीम चालू केली. २०२३ मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये जागरूकता मोहीम राबवून नशामुक्त भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, तसेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार झाला.
१७. अन्य
अ. भारतातील १० लाख लोकांनी युनिसेफ-एओएल मोहिमेअंतर्गत मुलींचे संरक्षण करण्याचे वचन दिले. गर्भवती महिलांच्या लिंग चाचणीविरुद्ध सुमारे १ लाख लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.
आ. भारतातील १२ राज्यांमधील ४५ सहस्रांहून अधिक जणांना ‘ग्रामीण किशोरांसाठी एच्आयव्ही/एड्स जागरूकता’ मोहिमेचा लाभ झाला आहे.
इ. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या गोशाळांमध्ये ३५० हून अधिक स्थानिक प्रजातींच्या गायी पाळल्या जातात.
(संदर्भ : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संकेतस्थळ)