Sher Afzal Khan Marwat : जर भारताशी युद्ध झाले, तर मी इंग्लंडला पळून जाईन ! – शेर अफजल खान मारवत, खासदार, पाकिस्तान

 पाकिस्तानचे खासदार शेर अफजल खान मारवत यांचे विधान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतासमवेतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख आणि उच्च सैन्याधिकारी यांनी त्यांच्या कुटुंबियांना परदेशात पाठवले आहे. आता एका पाकिस्तानी खासदारानेही तोच मार्ग अवलंबण्याची घोषणा केली आहे. ‘जर भारताशी युद्ध चालू झाले, तर बंदूक घेऊन सीमेवर लढण्यासाठी जाणार का ?’ असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ‘जर दोन्ही देशांमध्ये युद्ध चालू झाले, तर इंग्लंड येथे पळून जाईन’, असे पाकिस्तानचे खासदार शेर अफजल खान मारवत यांनी उत्तर दिले.

‘तणाव अल्प करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी माघार घ्यावी का ?’ या प्रश्नावर मारवत म्हणाले की, मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहे का की, ते माझ्या म्हणण्यावरून मागे हटतील ?

संपादकीय भूमिका

पाकमधील बहुतेक सैन्याधिकारी आणि राजकीय नेते भारतासमवेत युद्ध चालू झाल्यानंतर विदेशात पळून जाणार आहेत, हे तेथील जनतेलाही ठाऊक आहे. यांपैकी मारवत हे एक असून ते उघडपणे ही गोष्ट सांगत आहेत !