India Cuts Chenab Water Flow : भारताने चिनाब नदीवरील बागलिहार धरणाचे पाणी थांबवले

चिनाब नदीवरील बागलिहार धरण

नवी देहली – भारताने सिंधु नदी करार रहित केल्यानंतर आता चिनाब नदीवर बांधलेल्या बागलिहार धरणातून चिनाब नदीचे पाणी अडवले आहे. झेलम नदीवर बांधलेल्या किशनगंगा धरणातून वहाणारे पाणीही अडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारत सरकार या धरणांमधून वीज निर्मिती करते आणि त्यासमवेतच या धरणांद्वोर भारत या नद्यांमध्ये पाणी साठवू आणि सोडू शकतो.