रशियातील पाकिस्तानचे राजदूत महंमद खालिद जमाली यांची धमकी

मॉस्को (रशिया) – जर भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले किंवा पाकिस्तानचा पाणीपुरवठा खंडित केला, तर पाक अण्वस्त्रांसह संपूर्ण सैनिकी शस्त्रागाराचा वापर केला जाईल, अशी धमकी रशियातील पाकिस्तानचे राजदूत महंमद खालिद जमाली यांनी दिली. ते रशियाच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.
Pakistan's envoy to Russia says, "We'll nuke India!" ☢️ Seriously?!
India & Pakistan haven't even had a war, yet every Pak leader talks about dropping the A-bomb.
Sounds like a desperate (and laughable!) attempt to mask their fear.🤔#IndiaPakistanWarpic.twitter.com/RENz44QMah
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2025
पाककडून सलग १० व्या दिवशी सीमेवर गोळीबार
पाकिस्तानने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत सलग १० व्या दिवशी नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, उरी आणि अखनूर या भागांत गोळीबार केला आहे.
संपादकीय भूमिकाभारत आणि पाक यांच्यात अद्याप युद्ध झालेले नाही; मात्र पाकचे प्रत्येक नेते भारतावर अणूबाँब टाकण्याची भाषा करत आहेत. यावरून त्यांना वाटत असलेली भीती दूर करण्याचा ते हास्यास्पद प्रयत्न करत आहेत, हेच लक्षात येते ! |