विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने प्रतीकात्मक पुतळा दहन !
पाचोरा (जिल्हा जळगाव) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २७ हिंदु पर्यटकांवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ ३ मे या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला, तसेच पाचोरा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील बाजारपेठ बंद असल्याने सायंकाळपर्यंत सर्वत्र शुकशुकाट होता.
विश्व हिंदु परिषदेचे प्रखंड मंत्री श्री. योगेश सोनार, बजरंग दलाचे प्रखंड सहयोगी श्री. बंटी पाटील, विश्व हिंदु परिषदेचे प्रचारक श्री. योगेश पाटील, श्री. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जारगाव चौफुलीपासून नागसेननगर, छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चा आल्यानंतर पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने हिंदु बांधव आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. निषेध मोर्च्यात ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी पाचोरा पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.