हिंदुत्वाच्या एकमेव भूमिकेवर त्याच्या एकमेव ध्वजाखाली संघटित होणे महत्त्वाचे !

आता ही एक अखेरचीच संधी ! आता नाही, तर पुढे केव्हाही नाही ! हिंदूंचा हिंदुस्थान या मानाने जगायचे, टिकायचे आणि स्वतंत्रतेत उन्नत व्हायचे असेल, तर एकच मार्ग – तुझे इतस्ततः उधळलेले, विघटित झालेले सारे घटक एकत्र करून येणार्‍या संकटांशी दोन हात करण्यासाठी दृढ निश्चयाने उभा रहा ! आतून आणि बाहेरून पेटलेल्या या आक्रमणाच्या खाईत जळून भस्मसात् न व्हावे, याकरता केवळ एकच उपाय तुझ्यापाशी शिल्लक आहे. हिंदुत्वाच्या एकमेव भूमिकेवर त्याच्या एकमेव ध्वजाखाली संघटित हो !

हिंदुत्वाच्या एकमेव भूमिकेवर, त्याच्या एकमेव ध्वजाखाली संघटित हो. ७-८ कोटी मुसलमान जर पाकिस्तानसारखी दुष्ट ‘स्वप्ने’ प्रत्यक्षात उतरवण्याची ईर्षा बाळगतात, तर आम्ही कोटी कोटी हिंदूंनी निदान ‘आमच्या मातृभूमीचे तुकडे पडू नयेत. ती स्वतंत्रतेत नांदावी, तिला वैभवाचे दिवस दिसावे, अशा सात्त्विक आकांक्षा खर्‍या करूच करू’, असा विश्वास का बाळगू नये ? दुसर्‍या कुणाचे बळकवण्यासाठी नव्हे, तर आमचे स्वतःचे प्राणप्रिय हिंदु राष्ट्र शत्रूच्या कारवायांना अडकू नये; म्हणून आमचा समाज, संस्कृती, धर्म नामशेष होऊन जाऊ नये, या पवित्र हेतूसाठी तरी एका संघटनेत समाविष्ट होणे, हे सार्‍या हिंदूंचे आद्य कर्तव्य आहे !

मग अशा संघटित आणि बलान्वित हिंदुस्थानावर पारतंत्र्य लादण्याची किंवा त्याची लचकेतोड करण्याची आशा यक्षनगरीत वावरणार्‍यांनीच केवळ धरावी !

(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने,’ संचालक : अमरेंद्र गाडगीळ)