
मुंबई – सरकारने १०० दिवसांच्या विभागांचे केलेले मूल्यांकन फसवे आणि धूळफेक करणारे आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीवरील मूल्यांकनावर टीका केली. य २ मे या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अंबादास दानवे म्हणाले की,…
१. एकप्रकारे भ्रष्टाचाराच्या सूत्रांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने मूल्यांकनाचा घाट घातला आहे. सरकारने त्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन जनतेकडून घ्यावे. एप्रिल मासात विभागांच्या केलेल्या गुणांकात एका मासात वाढ कशी केली ?
२. राज्यात गुटखा, अमली पदार्थ यांवर बंदी असतांनाही ते गुजरात येथून अवैधरित्या पालघर येथे आणले जाते.
३. ‘पिंक रिक्शा’ उपक्रम अयशस्वी ठरला आहे. आशासेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित आहे. महिला आणि बालविकास विभागाने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असतांना त्याला १ ला क्रमांक कसा दिला ?