सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘एम्.डी.’ न होता, मानसोपचारतज्ञ होणे, हाही ईश्वरी नियोजनाचा भाग !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘माझे एम्.बी.बी.एस्. (बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी) या वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी त्यापुढील ‘एम्.डी.’ (डॉक्टर ऑफ मेडिसिन) चे शिक्षण पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होतो; परंतु मी ‘मानसोपचार’ या विषयाकडे वळलो. त्यामुळे पुढे मला मन आणि अहं यांचे कार्य कसे चालते आणि त्यांवर मात करता येईल, अशी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शोधता आली. आज ही प्रक्रिया गुरुकृपायोगानुसार साधनेचा मूलभूत पाया झाली आहे. थोडक्यात त्या काळात माझा शिक्षणाचा विषय पालटणे, हेही ईश्वरी नियोजनच होते. ’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधनेचा अभाव’ हेच मनोविकार वाढण्याचे मूळ कारण होय !

‘मानवाचे लक्ष खरा आनंद देणार्‍या साधनेऐवजी ऐहिक सुखाकडे केंद्रित झाल्याने आता समाजात मनोविकार आणि मानसोपचार तज्ञ वाढले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले