सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाच्या बोधचिन्हाचे २१.३.२०२५ या दिवशी लोकार्पण करण्यात आले. या बोधचिन्हाकडे पाहून जाणवलेली सूक्ष्म स्तरावरील सूत्रे पुढे दिली आहेत.
१. बोधचिन्हात ‘स्वयंभू तेज’ असणे
बोधचिन्हाकडे पाहिल्यावर ‘त्यातून पांढर्या रंगाचा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. बोधचिन्हात ‘स्वयंभू तेज’ (टीप) जागृत झाले आहे’, असे मला वाटले.
टीप – स्वयंभू तेज : ज्या वेळी मानवी प्रयत्नांमुळे नाही, तर ईश्वरी इच्छेने एखादी वस्तू, चित्र किंवा ठिकाण येथे चैतन्य घनीभूत होते, तेव्हा त्याला ‘स्वयंभू तेज’ म्हणतात. स्वयंभू तेजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला खंडित करता येत नाही. त्यावर वाईट शक्तींची कितीही आक्रमणे झाली, तरी ते तेज सतत प्रवाहित होत असते.
२. बोधचिन्हात तेजतत्त्वासह आकाशतत्त्वही कार्यरत असणे

बोधचिन्हाकडे सलग काही सेकंद पाहिल्यावर ‘ते मोठे मोठे होऊन विश्व व्यापत आहे’, असे मला जाणवले. ‘व्यापकता’ हा आकाशतत्त्वाचा गुणधर्म आहे. प्रत्यक्षात बोधचिन्ह हे चित्र असल्याने त्यात तेजतत्त्व अधिक असायला हवे होते; पण ‘तेजतत्त्वासह त्यात आकाशतत्त्वही कार्यरत झाले आहे’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
३. बोधचिन्हातून चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होणे : बोधचिन्हातून ‘चैतन्य ४० टक्के, आनंद ३० टक्के, तर शक्ती, भाव आणि शांती यांची स्पंदने १० टक्के एवढ्या प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले. व्यष्टी स्तरावर काढलेल्या बोधचिन्हात ‘शक्ती, भाव आणि शांती’ अधिक प्रमाणात असते, तर समष्टी स्तरावर कार्य करणार्या बोधचिन्हांमध्ये ‘चैतन्य आणि आनंद’ अधिक प्रमाणात असतो. यातून बोधचिन्हाचे कार्य ‘व्यष्टी स्तरावरचे नसून समष्टी स्तरावरचे आहे’, असे लक्षात आले.
४. ‘इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती’ यांचा संगम असलेले बोधचिन्ह !
बोधचिन्हातील ध्वजाकडे पाहिल्यावर मला इच्छाशक्तीची स्पंदने जाणवली. शंखनाद करणार्या श्रीकृष्णाकडे पाहिल्यावर मला क्रियाशक्तीची स्पंदने जाणवली, तर बोधवाक्याकडे पाहिल्यावर मला ज्ञानशक्तीची स्पंदने जाणवली. यांतून ‘बोधचिन्हात ‘इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती’ यांचा संगम झाला आहे’, असे मला जाणवले.
५. बोधचिन्हाचा व्यक्ती, वास्तू आणि वायूमंडल यांवर जाणवलेला परिणाम
५ अ. व्यक्तीवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होणे : बोधचिन्हात ‘स्वयंभू तेजतत्त्व’ असल्याने त्याच्याकडे पाहिल्यावर व्यक्तीवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊन तिला प्राणशक्ती मिळते.
५ आ. मन निर्विचार होण्यास साहाय्य होणे : बोधचिन्हात आकाशतत्त्व कार्यरत असल्याने त्याच्याकडे बघितल्यावर मनातील रज-तम युक्त अनावश्यक विचार ब्रह्मांड पोकळीकडून शोषून घेतले जात असल्याने मन निर्विचार होण्यास साहाय्य होते.
५ इ. चैतन्य आणि आनंद अनुभवण्यास साहाय्य होणे : बोधचिन्हातून प्रक्षेपित होणारे चैतन्य थेट व्यक्तीच्या अनाहत आणि आज्ञा या चक्रांवर परिणाम करते. त्यामुळे व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी तिला चैतन्य अनुभवण्यास, तर आज्ञाचक्र जागृत झाल्यामुळे देहबुद्धी अल्प होऊन आनंद अनुभवण्यास साहाय्य होते.
५ ई. वातावरणातील दाब नष्ट होण्यास साहाय्य होणे : बोधचिन्हात श्रीकृष्ण, म्हणजे देवत्व असल्याने बोधचिन्हातून वास्तू आणि वायूमंडल यांमध्ये चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे वातावरणातील दाब, त्रासदायक शक्ती आणि अशुद्धी नष्ट होण्यास साहाय्य होते, तसेच वास्तूभोवती काही प्रमाणात चैतन्याचे सुरक्षाकवच निर्माण होऊ शकते.
कृतज्ञता
देव स्वयंपूर्ण असल्याने त्याने निर्माण केलेल्या छोट्याहून छोट्या गोष्टीतही त्याचे तत्त्व कार्यरत असल्याने त्याची अनुभूती घेता येते. ‘बोधचिन्ह’ हा ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाचा एक छोटासा भाग आहे, तरीही त्यातून एवढ्या अनुभूती येतात, तर ‘प्रत्यक्ष महोत्सवात किती अनुभूती येतील ?’, याची कल्पनाही करता येत नाही. साधकांना ‘न भूतो न भविष्यति’ अशा आध्यात्मिक सोहळ्याचा अनुभव घेण्याची संधी देणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |