‘इंग्रजी भाषेत शब्दाचा उच्चार आणि त्याचे स्पेलिंग यांमध्ये पुष्कळ विसंगती असते. याउलट मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांत शब्द जसे उच्चारले जातात, तसेच ते लिहिले जातात. यांचा व्यक्तीवर सूक्ष्मातून कोणता परिणाम होतो ?’, यासंदर्भात ईश्वरी कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. इंग्रजी भाषेत शब्दाचा उच्चार आणि त्याचे स्पेलिंग यांमध्ये पुष्कळ विसंगती असण्यामागील कारण
५ व्या पाताळातील ‘मही’ या वाईट शक्तीने इंग्रजी भाषेची निर्मिती केली. ही निर्मिती करत असतांना त्याने ‘भ्रामरी’ नावाच्या शक्तीचा उपयोग केला. ‘भ्रामरी’ ही एक तमोगुणी शक्ती असून ती व्यक्तीत भ्रम उत्पन्न करू शकते. त्यामुळे तिला ‘भ्रामरी’ हे संबोधन आहे.
‘मही’ या वाईट शक्तीला इंग्रजी भाषेद्वारे व्यक्तीवर नियंत्रण मिळवायचे होते. त्यामुळे तिने इंग्रजी भाषेची निर्मिती केली. ही प्रक्रिया भाषेतील शब्दांचा उच्चार आणि लिखाण यांमध्ये विसंगती निर्माण करून जलद गतीने साध्य होणार होती. इंग्रजी भाषेची अशा पद्धतीने रचना करून ‘मही’ या वाईट शक्तीने हे साध्य केले.
सात्त्विक भाषांसाठी आणखी १०० वर्षांनंतरचा काळ अनुकूल आहे !
‘पृथ्वीवरील रज-तम न्यून होऊन सत्त्वगुण स्थिर होण्यास आणखी १०० वर्षे लागतील. त्यानंतर मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांचे महत्त्व वाढू लागेल.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२४)
२. शब्दाच्या उच्चारानुसार लिखाण केल्याने होणारे लाभ आणि तसे न केल्याने होणारी हानी
२ अ. शब्दाच्या उच्चारानुसार लिखाण केल्याने होणारे लाभ
२ अ १. भाषा ‘व्यवहार’ आणि ‘अध्यात्म’ यांना पूरक बनणे : ‘शब्दांच्या उच्चारांनुसार लिखाण करणे’, हे ‘अक्षरशास्त्र’ किंवा ‘अक्षरयोग’ या विषयांत गणले जाते. पृथ्वीवरील प्रत्येक घटकात त्रिगुण आणि पंचतत्त्वे यांचा समावेश आहे.
ऋषींनी भाषेची निर्मिती करतांना प्रत्येक विषयातील गुणाचा (म्हणजे त्रिगुण आणि त्यातील पंचतत्त्वे यांचा) विचार केला अन् त्याला अनुरूप असलेल्या गुणाशी निगडित शब्द, त्यानंतर उच्चार आणि त्यानुसार त्याचे लिखाण निश्चित केले. त्यामुळे मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषा व्यक्तीचा व्यवहार अन् अध्यात्म यांसाठी पूरक बनल्या.
२ अ २. मेधाशक्ती वाढणे : शब्दांच्या उच्चारांनुसार लिखाण केल्याने व्यक्तीच्या बुद्धीशी संबंधित ‘मेधा’ या शक्तीत वाढ होते. ‘मेधा’ ही शक्ती ज्ञानाशी संबंधित आहे. त्यामुळे व्यक्तीची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढते.
२ अ ३. बुद्धीला स्थिरता आणि बळ प्राप्त होणे : मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांत शब्दांच्या उच्चारांनुसार लिखाण केल्याने व्यक्ती निसर्ग अन् अध्यात्म यांना पूरक बनते. त्यामुळे व्यक्तीतील सत्त्वगुण टिकून रहाण्यास साहाय्य होते. या प्रक्रियेतून बुद्धीची जडणघडण योग्य प्रकारे होते. त्यामुळे बुद्धीला स्थिरता आणि बळ प्राप्त होते.
२ अ ४. बुद्धीची एकूण कार्यक्षमता अनेक पटींनी वाढणे : मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांत शब्दांच्या उच्चारांनुसार लिखाण केल्याने बुद्धीची ‘विषय समजून घेणे आणि तो ग्रहण करणे’, यांसंदर्भातील क्षमता वाढते. त्यामुळे बुद्धीची कार्य करण्याची एकूण क्षमता अनेक पटींनी वाढते.
२ आ. शब्दाच्या उच्चारानुसार लिखाण न केल्याने होणारी हानी
२ आ १. व्यक्तीची बुद्धी अस्थिर आणि भ्रमित होऊ लागते; कारण ‘शब्दाच्या उच्चारानुसार लिखाण न करणे’, हे अक्षरयोगाच्या विरुद्ध आहे.
२ आ २. सात्त्विकता न्यून होणे : भाषेतील शब्दांच्या उच्चारांनुसार लिखाण न केल्याने व्यक्तीचा बुद्धीशी संबंधित असलेली ‘मेधा’ ही दैवी शक्ती आणि ‘गणपति’ ही देवता यांच्याशी असलेला संपर्क तुटतो. त्यामुळे बुद्धीची सात्त्विकता न्यून होते, परिणामी व्यक्तीची बुद्धी अस्थिर होऊ लागते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२४) (समाप्त)
|