|

रत्नागिरी – येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पहलगाम आक्रमणाविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्या महिला प्राध्यापिका सोनल दारोकर यांना ‘संविधान सन्मान मंच’च्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. ज्या विद्यार्थ्यांना शिकवतांना आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली, त्यांनीही दारोकर यांनी अशी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे प्राध्यापिका सोनल दारोकर यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा नोंदवावा, अशा मागणीचे निवेदन ‘संविधान सन्मान मंच’चे कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उदय पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर प्राचार्य उदय पाटील यांनी ‘प्राध्यापिका सोनल दारोकर यांचे निलंबित करू’, असे आश्वासन दिले.
या वेळी संविधान सन्मान मंचचे श्रीमती अनघा जैतपाल, सौ. वर्षा ढेकणे, सौ. सायली बेर्डे, सौ. भक्ती दळी, सौ. वैशाली खाडिलकर, सर्वश्री चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे, अभय दळी, नंदकुमार चव्हाण, राज परमार, विराज चव्हाण, गणेश गायकवाड, दादा ढेकणे, शैलेश बेर्डे, संजय जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘संविधान’ हा विषय दुसर्या वर्षाच्या AI&DS’ च्या विद्यार्थ्याना शिकवणार्या महिला प्राध्यापिका सोनल दारोकर यांनी २९ एप्रिल २०२५ या दिवशी वर्गाचा दरवाजा बंद करून पहलगाम आक्रमणाविषयी काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली.
याची माहिती ‘संविधान सन्मान मंच’च्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी २ मे या दिवशी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात धडक देऊन प्राचार्यांना याविषयी वस्तूस्थिती विचारली. त्या वेळी संबंधित महिला प्राध्यापिका सोनल दारोकर यांनाही बोलावण्यात आले. ‘आपण असे काही बोललोच नाही’, असा पवित्रा सोनल दारोकर यांनी घेतल्यानंतर त्यांनी ज्या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ही विधाने केली, त्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावून शहानिशा करण्यात आली. त्या वेळी विद्यार्थ्यांनी दारोकर यांनी अशी वक्तव्ये केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई चालू केली आहे.
प्राध्यापिका सोनल दारोकर यांच्याच शब्दांतील आक्षेपार्ह वक्तव्ये !
१. भारतात सध्या काय वातावरण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का ?
२. तुमच्यातील मॉमेडियन (मुसलमान) कोण आहे ? भारतात खूप भेदभाव आहेत, जातीपाती आहेत.
३. डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली होती.
४. स्त्रियांना काही दर्जा नव्हता त्यांना काही अधिकार नव्हते, इथे सती प्रथासुद्धा होती, नवरा मेला म्हणून बायकांनासुद्धा त्यांच्यासोबत जाळलं जायचं ! बघा किती क्रूर आहे हे !
५. मुस्लिम ट्रस्टमध्ये सुरुवातीपासूनच ३ महिलांना आरक्षण देण्यात आले होते.
६. हिंदूंना त्यांच्यातील एक आता ‘मुस्लिम ट्रस्ट’मध्ये बसवायचा आहे.
७. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाच नाही, आपण ते काही बघायला तिकडे नव्हतो.
८. हिंदूंनी दहशतवादी हल्ल्याच्या खोट्या बातम्या मिडियाद्वारे पटापट पसरवल्या
९. मुस्लिम ट्रस्टची संपत्ती १००० करोड इतकी आहे.
१०. हिंदूंना दहशतवादी हल्ल्याच्या नावाखाली मुसलमानांची जमीन बळकवायची आहे. पाकिस्तानने नाही, तर हा हल्ला आपल्याच लोकांनी घडवून आणलेला आहे, असे तुम्हाला वाटत नाही का ?
११. फक्त आपले शत्रू राष्ट्र असल्यामुळे पाकिस्तानला काही कारण नसतांना यामध्ये ओढेले जात आहे.
१२. सुप्रीम कोर्टने सरकारला एक प्रश्न विचारलेला आहे त्याचे उत्तर देण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे.
१३. बरोबर या एका महिन्यातच कसा दहशतवादी हल्ला होतो ?
१४. तुम्ही मिडियामध्ये पाहिले असेल. एक बाई आतंकवाद्यांना विचारते की, आम्हाला का मारायला आलात, तर ते म्हणतात ना की, मोदीला जाऊन विचारा. बघा त्यांच्या तोंडून चुकून निघालेच, ज्यांनी हल्ला केला त्यांनाच विचारा का केला ते, असंच म्हटले न ते पंतप्रधान २६ जानेवारीला फक्त एकतेबद्दल भाषण करतात. फक्त बोलण्याने थोडी काय एकता होते त्यासाठी हे सगळे काम बंद करावे लागतात.
संपादकीय भूमिका
|