
देहली – शस्त्र कायद्याच्या अंतर्गत प्रत्येकाने परवाना घेऊन शस्त्र बाळगले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी जिल्हा दंडाधिकार्यांच्या माध्यमातून अधिकृत शस्त्र परवाना मिळण्यासाठी अर्ज करावा. ज्यांना अधिकृत शस्त्र परवाना दिला जाणार नाही, त्यांनी त्यासाठी कायदेशीर लढाई लढावी. घरात केवळ सुरा ठेवून काम भागणार नाही, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका चर्चासत्रात केले.
🛡️ ‘Knives Won’t Protect Your Family’: SC Advocate @Vishnu_Jain1 Urges Citizens to Apply for Arms Licenses Now 🔫🇮🇳
In the wake of the #PahalgamTerrorAttack on Hindus, he says every law-abiding Indian must take charge of their safety by applying through District Magistrates and… pic.twitter.com/NzW7xk5jwf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2025
या चर्चासत्रात एका जिज्ञासूने ‘प्रत्येकाच्या घरी देवघर आहे. त्यात देवतेच्या रुपात सुर्याची स्थापना केल्यास त्याच्याशी आपली बांधिलकी राहील’, असा उपाय सुचवला. त्यावर बोलतांना अधिवक्ता जैन यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, सदर अर्ज कसा करायचा ?, याविषयी मी मार्गदर्शन करीन.